वसई तालुक्याला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. कळंब समुद्रकिनारा (बीच) त्यातीलच एक. परंतु या ठिकाणी कचर्याचे साम्राज्य पसरलेले आहे. या ठिकाणी कचरा जमा करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. कचरा टाकण्यासाठी कचराकुंड्याही नाहीत. काही युवकांनी स्वच्छतेची मोहिम चालु केली अाहे. परंतु कचरा टाकण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. तरी या मोहिमेत जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे व प्रशासनाने कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करावी ही विनंती.
वसई तालुक्यातील कळंब समुद्रकिनार्याची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2017, 5:40 am