शहापुर तालुक्यातील खर्डी येथून मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर(वैतरणा),तानसा व भातसा हे तीन धरण 10 ते 12 किलोमीटर वर आहेत पण 100 किलोमीटर वर असलेल्या मुंबईला येथून पाणीपुरवठा होतो परंतु खर्डीतील स्थानिक राहिवश्याना विहीरितिल पाणी टीपुन भरण्यासाठी दिवसाची रात्र व् रात्रीचा दिवस करुन ,ऐन थंडीत खर्डीच्या वाकणाच्या विहीरिवर रात्री 2 वाजेपासून शेकोटी पेटवुन व् तेथेच झोपुन विहीरितिल 2 ड्रम पाणी टीपुन भरण्यासाठी 4 तास लागत असुन ,त्तिथे राहिवाशी नंबर प्रमाणे पाणी टीपुन भरत असुन येथील योजना पूर्णपणे कालबाह्य झाल्याने ती बंद अवस्थेत असुन येथील नागरिक नविन पाणीपुरवठा योजना मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत.यासाठी शासनाने प्रस्तावित पाणीपुरवठा योजना लवकर करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.100 रूपये प्रमाणे येथे खाजगी टैंकर वाल्याकडून पाणी विकत घ्यावे लागत आहेत. श्री.नरेश जाधव,खर्डी,9975460007
खर्डीत पाणी टीपुन भरण्यासाठी रात्र विहीरिवर जागरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2017, 5:32 am