ठाणे कोपरी मधिल वाहतूक नियंत्रण कक्ष मोठ्या थाटात आणले परंतु वाहतूक नियंत्रण कक्षाचा कारभार ज्या ठिकाणावरून चालतो , तेच ठिकाण नागरिकांची ये जा करताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते , तसेच पादचाऱ्यांना ये जा करताना सकाळी संध्याकाळी मोठया जिकरीचे ठरते वाहतूक पोलीस ज्या नो पार्किंग क्षेत्रातील गाड्या उचलून आणतात त्या ही येथेच रस्त्यावर पार्क करतात त्यामुळे आणखीन वाहतूक कोंडी होते व नाईलाजाने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते तरी वाहतूक नियंत्रण कक्षाला एक विनंती आहे की त्यांनी हे कक्ष लवकरात लवकर येथून हलवावे जेणेकरून पादचाऱ्यांना ये जा करताना कोणताही अपघात होणार नाही
रहदारीस अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jan 2019, 5:38 am