सर्जेपुरासर्जेपुरा भागातली भाकरे गल्ली येथे भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. ती पकडण्यात यावीत, असा विनंती अर्ज नागरिकांनी महापालिकेकडे दोन महिन्यांपूर्वीच केला आहे. मात्र, त्यावर अद्याप काहीही कारवाई होत नाही. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा त्रास सुरूच आहे. मुख्य रस्ता आणि गल्ल्यांमधून या कुत्र्यांच्या टोळ्या फिरतात. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर या कुत्र्यांची दहशत आहे. काही भागात अशा कुत्र्यांचा हल्ला झाल्याच्या घटना घडल्याने कुत्री दिसताच नागरिक मुलांना बाहेर पाठविणे टाळत आहेत. महापालिकेच्या पथकाने याची दखल घेऊन कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा.- विनायक वारनौक
भटक्या कुत्र्यांचा त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2017, 5:33 am