सारसबागेत योग्य ठिकाणी कचरा कुंडी नसल्यामुळे लोकांनी घरून आणलेले पदार्ध किंवा तिथे विकत घेऊन खाऊन पेपर्स, प्लास्टिक पिशवी तसच बागेत फेकून देतात. जर प्रशासनाने योग्य ठिकाणी कचरा कुंडी ची संख्या वाढवली आणि लोकांनी सुद्धा सामाजिक जाणीव ठेवून कचरा योग्य त्याच ठिकाणी टाकला तर परिसर स्वच्छ राहायला खूप मदत होईल. प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती सोय करावी. जेणे करून सुंदर सारसबाग सुंदर च राहील.
सारसबागेत कचरा चे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 May 2017, 5:38 am