कारवाईत सातत्य हवेपालिकेने सर्वत्र मोठमोठे पादचारी मार्ग बनवले आहेत. त्यापुढे अरुंद रस्ता लगेचच दुभाजक अशी अवस्था सर्वत्र करून ठेवली आहे. त्यातच भाजीवाले मंडई सोडून येथेच ठाण मांडून बसतात. कधीतरी गाडी येते व सर्व उचलून नेते. पदपथावरून सर्रास वाहने नेली जातात. वाहने पार्कदेखील केली जातात. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथाचा उपयोगच होत नाही. पदपथावरील सर्व प्रकारच्या अतिक्रमणावर दररोज कडक कारवाई व्हायला हवी. अर्चना रानडे
कारवाईत सातत्य हवे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jul 2019, 5:42 am