पुणे शहर मोठ्या प्रमाणावर चोहोबाजूंनी वाढले असून शहरात बाहेरून येणाऱ्या संख्या मोठी आहे. शहरात सर्व प्रकारची वाहने वाढल्याने येणारा धूर आणि वाढलेले प्रदूषण वाढले आहे. कचऱाचे प्रमाणही वाढत असून त्याची विल्हेवाट लावण्यात महापालिका कमी पडते आहे. अनेक ठिकाणी तो नियमित उचलला जात नाही जागो जागी रस्त्यावर कचर्याचे ढीग साठलेले दिसतात सर्वात जास्त कचरा उचलणारे कर्मचारी कचरा जाळतात. नागरिकांनीही याबद्दल जागरुकता दर्शविणे गरजेचे आहे. आपल्याकडील कचरा पेटीत अगर घंटागाडी द्यावा तो जाळणे टाळावे. महापालिकाने कर्मचाऱ्यांना समजावून किंवा प्रशिक्षण दिले पाहिजे. जो कर्मचारी कचरा जाळण्याचे काम करेल त्याला दंडात्मक अथवा समज देवून सोडावे कचरा उचलण्याचे कामासाठी कर्मचारी वाढविला पाहिजे.
कचरा जाळून धुराचे प्रदूषण टाळावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2019, 11:32 am