भाजपने निवडणूकांसाठी गॅस, पेट्रोल दरवाढीचा मुद्दा जोरदारपणे मांडून त्यांना निवडून दिल्यास हे दर कमी करण्याचं जनतेला आश्वासन दिलं. जनतेने विश्वास टाकून भाजपला मत दिले. दर कमी न होता दुपटीने वाढले. हाच पक्ष आता वीज दरवाढीवर आंदोलन करीत आहे. दरवाढीचा केवळ राजकीय लाभासाठी मुद्दा केला जात असल्याचे दिसून येते. जनतेने भूलथापांना बळी पडू नये हेच खरं.
भाजपने दरवाढीवर निवडणुका जिंकल्या...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Feb 2021, 5:32 am