सार्वजनिक बागा नागरिकांना फिरण्यासाठी व व्यायामासाठी खुल्या केल्या आहेत. पण सर्वच सार्वजनिक बागांमध्ये गवताचे आणि कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. कै.डॉ. वा. द. वर्तक उद्यानातील हे चित्र. गवत खूप वाढले असून पाण्याचे पाईप देखील नागरिकांच्या फिरण्याच्या मार्गावर पडले आहे. जमा झालेला कचरा येथेच जळलेला दिसतो आहे. कचऱ्याच्या लादी वरून नागरिकांना फेरफटका मारावा लागत आहे. यामुळे जिमचे साहित्य सुद्धा दिसेनासे झाले आहे.
सार्वजनिक बागांमध्ये कचऱ्याचे व घाणीचे साम्राज्य..
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2020, 5:32 am