सिंहगड रोड : स्मार्ट सिटीची स्वप्न रंगवली जात असताना शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरात बहुतांश भागात इतस्तः टाकलेला कचरा ही मोठी समस्या आहे. बसस्टॉपजवळ कचरा टाकणे हे तर अगदी नेहमीचे झाले आहे. सकाळी साडे दहापर्यंत कचरा उचलला जात नाही आणि अर्ध्या तासात पुन्हा रस्त्यावर कचरा असतोच. महापालिकेच्या संबंधित विभागाने याची दखल घ्यावी.
- उदय यार्दी
- उदय यार्दी