उद्यान विभागाचे दुर्लक्षपरवानगी न घेता काही ठिकाणी सरसकट झाडे बुंध्यापासुन काढण्याचे प्रकार घडत आहेत आणि या प्रकाराकडे पालिकेच्या उद्यान विभागाचे अजिबात लक्ष नसते. किंवा मुद्दाम कानाडोळा केला जातो. पावसाळ्यापूर्वी किंवा केव्हाही झाडाच्या फोटोसह अर्ज दिला तरीही दोन तीन महिन्यात तपासणी करून जरी परवानगी मिळाली तरीही जो पर्यंत ठेकेदार मनावर घेत नाही तोपर्यंत काहीच हालचाली होत नाही. सर्वच झाडे तोडण्यासारखी नसतात फक्त फांद्या काढून टाकल्या तरी काम होते परंतु ठेकेदार याकडे दुर्लक्ष करतात. ठेकेदाराला मागेल तसा मोबदला द्यावा लागतो. खरे तर उद्यान विभागाने वेळच्या वेळी पाहणी करून धोकादायक झाडे काढून टाकावीत आणि त्या जागी नवीन झाडे लावावे. डी. एस. हेडाऊ
उद्यान विभागाचे दुर्लक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 May 2019, 5:43 am