आंबेगाव पथदिवे गरजेचे विवा सरोवर ते लेकलाइफ सोसायटी वळणावर निर्जन आणि महिलांसाठी धोकादायक भाग असल्याने तेथे प्रकाशमय पथदिव्यांची नितांत गरज आहे. तेथे तातडीने पथदिवे उभारावेत, अशी रहिवाशांची अपेक्षा आहे. तसेच पूर्वी मागणी केल्याप्रमाणे विठ्ठलनगर कमानीजवळ पथदिव्याचे खांब ठेवले होते. मात्र, ते तेथून उचलून अन्यत्र वापरले गेले असे दिसते, तरी विठ्ठलनगरमध्ये सुद्धा पथदिवे तातडीने उभारावेत.चंद्रकांत गुरव
पथदिवे गरजेचे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Oct 2019, 5:43 am