पुण्यात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. विशेषत: सकाळी फिरायला जाताना ही कुत्री समुहानी फिरत असतात आणि अचानक अंगावर धावून येतात. अनेकांना ती चावतात. महापालिकेने या कुत्र्यांचा बंदोबस्त वारंवार करणे गरजेचे आहे. कुत्र्यांची नसबंदी ही फक्त कागदावरच दिसते. प्रत्यक्षात संख्या वाढतेच आहे. तरी कुत्री पकडणे मोहीम कडकपणे राबवावी.
भटक्या कुत्र्यांची समस्या...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 May 2019, 5:40 am