केवळ निधीचा अपव्ययप्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या हट्टामुळे गल्लीबोळातील छोटे रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण केले जात आहे. अत्यंत कमी रहदारी असलेले रस्ते सिमेंटचे करून निधीचा अपव्यय कशासाठी? या कामाचा दर्जा अत्यंत सुमार असतो. त्यावर कोणत्याही अभियंत्याची देखरेख नसते.रस्ता ऊंच झाल्यामुळे पावसाळ्यात सोसायटीच्या पार्किंग मधे पाणी साठण्याच्या घटना घडत आहेत.त्यामुळे गल्ली-बोळातील रस्ते कॉंक्रिटचे करणे हा निव्वळ निधीचा अपव्यय असून कोणाचे तरी खिसे भरण्यासाठी ही कामे केली जातात. यामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाणही कमी होत आहे. भरमसाठ कॉँक्रिटीकरण त्वरित थांबवाशिवाजी पठारे
केवळ निधीचा अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 May 2019, 5:40 am