जहांगीर रुग्णालयाजवळ असलेल्या पुलाचे काम चालू असून तेथील बोरचे अथवा अन्य पाणी पाईपने उघडपणे रस्यावर अलंकार टॉकीज येथील सिग्नलच्या दिशेला उतारावर सोडले जाते. यामुळे पाणी दिवसभर रस्त्यावर असून चौकामधे सिग्नलजवळ पाण्याचा डोह तयार होतो. सदर गैरप्रकारामुळे अपघात होण्याची शक्यता व गाडी सिग्नलला उभी करण्यास अडचण निर्माण होते. अशा पाणी सोडण्याच्या प्रकाराला परवानगी असते का ? अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण ? तरी हा प्रकार त्वरीत थांबवावा.
रस्यावरील पाण्यामुळे अपघाताची शक्यता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jul 2017, 5:35 am