नागरिकांचा अंत पाहणारी वाट रस्त्यात खड्डे पडलेले अनेक फोटो आपण बघत असतो पण इथे तर रस्ताच नाही.आणि हा फोटो एखाद्या खेड्यातला नाही तर .. कात्रज बायपास लगतचा! वहिवाटीच्या वादातून रस्त्याचे काम झालेले नाही .नेमका प्रश्न कुठे आहे हे कुणालाच माहित नाही आणि ही समस्या सोडवणाची कुणाचीच इच्छा दिसत नाही. गेल्या १० वर्षात डझनभर इमारती झाल्या. आणि आमच्या बिल्डर ने करून दिलेला रस्ता वाहून गेला. शेकडो कुटुंबे इथे रहातात. दर वर्षी हि समस्या अधिकाधिक बिकट होते आहे. यंदा तर अर्धवट रस्ता झाल्याने मध्ये दिड दोन फूट खोलीचं तळं साचलं आहे. इथे रोज अपघात होत आहेत.आंबेगाव ग्रामपंचायत, पोलिस स्टेशन यांच्याकडे वारंवार ह्याचा पाठपुरावा केला आहे.कुणाला जर ह्या वर तोडगा काढायचा असेल तर ठिकाण नेमके समजावे म्हणून ग्रामपंचायतीने लावलेल्या भव्य प्रभाग फलकासह फोटो दिले आहेत!
नागरिकांचे हाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2017, 5:38 am