पावसानंतर शहरात ठिकठिकाणी पाणी साठणे आणि गटारे तुंबण्यामागे अनेक कारणे आहेत. यात प्रमुख कारण म्हणजे प्रशासन आणि दुसरं म्हणजे तेथे राहणारे नागरिक. नागरिक मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकचा वापर करतात, हेच प्लॅस्टिक घरातून रस्त्यावर येते आणि जमिनीत पाणी जिरायला अडथळा निर्माण होतो. तसेच दरवर्षी नवीन बांधलेल्या रस्त्यावर पहिल्या पावसातच खड्डे पडायला सुरुवात होते. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण होते. आपल्याकडे साधारणतः जूनमध्ये पाऊस पडणार हे अपेक्षित असतच त्यामुळे तत्पूर्वी रस्त्यांची डागडुजी होणे आवश्यक आहे.
पावसाळ्यातील खड्डे आणि अपघात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jul 2019, 5:45 am