गणपती माथा ते वारजे या रस्त्यावर दोन-तीन ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच, अनेक ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे जाणवते. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यानंतर त्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघाताची मोठी शक्यता निर्माण होते. तरी, हा धोका टाळण्यासाठी महापालिकेने तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी, ही विनंती.
रस्त्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Oct 2019, 5:46 am