साधारण वर्षभरापूर्वी गांधी भवन रस्त्यावर स्मार्ट पदपथ आणि स्मार्ट बस थांबा (आधीचा सुस्थितीतला थांबा उखडून) करण्यात आला. काही महिन्यातच या मार्गाचे पुन्हा काँक्रीटीकरण करण्यास सुरूवात झाली. प्रत्यक्षात स्मार्ट बस थांबा येताच तिथे पीएमपीची बस कधी धावलीच नाही! आता पुन्हा तो काढला असून सुशोभीकरणाला सुरूवात झाली आहे. नागरिकांच्या पैशांचा अपव्यय करून लोकप्रतिनिधी, ठेकेदार, प्रशासन अधिकारी एकत्रित पणे भलतेच स्मार्ट झालेत एवढे नक्की!
स्मार्ट बस थांब्याची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Sep 2019, 5:47 am