पुणे सोलापूर रोडवरील पुलगेट ते फातिमानगर मार्गावरील पथदिवे गेल्या दीड महिन्यांपासून बंद आहेत. महापालिका आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. रात्री गाडी चालवताना खड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात रेसकोर्स येथील बसथांब्याचे टेम्पो धडकून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पथदिवे सुरू करावेत.
अजूनही पथदिवे बंदच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Sep 2019, 5:46 am