शहराच्या सगळ्याच भागात भटक्या कुत्र्यांचा ऊपद्रव वाढला आहे. जेष्ठ नागरिक व लहान मुलांच्या अंगावर ही कुत्री धाऊन जातात. भूतदया म्हणून नागरिक अशा कुत्र्यांना अन्न देतात त्यामुळे समस्या वाढतात. भटक्या कुत्र्यांची नसबंदी केल्याची कितीही वल्गना महापालिका करीत असली तरी या योजनेच्या यशाबद्दल संभ्रम आहे. दरवर्षी कोटीच्या निविदा काढल्या जातात. पण ठेकेदार किती कुत्री पकडतात आणि नसबंदी करतात याची आकडेवारी महापालिकेकडे नाही. भटकी कुत्री हा गंभीर विषय आहे. तसेच पाळीव कुत्र्यांची विष्ठा रस्त्यावर पडलेली दिसते, यावरही कायदा केला पाहिजे.
पुण्यात सगळीकडेच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Apr 2019, 5:39 am