पुण्यात पाणी वितरण व्यवस्थेतील गळतीचे प्रमाण ३५ ते ४० टक्के आहे,.असे महापालिका सांगते. एवढ्या मोठ्या प्रमाणातील गळती याचे कारण सदोष वितरण व्यवस्था हेच आहे.पन्नास वर्षापूर्वीच्या जुन्या पाइपलाइन हे गळतीचे मुख्य कारण आहे. या पाइपलाइन बदलणे,सार्वजनिक नळकोंडाळे दुरूस्त करणे, घराघरातील गळके नळ दुरूस्त करणे, प्रत्येक सोसायटीच्या टाकीस स्वयंचलीत सेन्सर बसविणे,अनधिक्रुत कनेक्शन काढून टाकणे,बांधकामांना आणि गाड्या धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरण्यावर कडक निर्बंध लावणे हे उपाय योजल्यास पाणीगळतीचे प्रमाण नक्कीच कमी होईल.कारण महापालिकेने पिण्यासाठी शुध्द केलेले पाणी वाया जात आहे. त्यासाठी केलेला खर्चही वाया जातो आहे. महापालिकेने याबद्दल दक्ष भूमिका घेतल्यास हे सर्व शक्य आहे.
जुन्या पाइपलाइन बदलणे आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2019, 5:40 am