भूमिगत वाहिन्यांनाही धोकाअतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे तसेच पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने विविध दुर्घटना घडतात. भूमिगत वाहिन्या असतील तिथे वेगवेगळ्या कामांसाठी केलेल्या खोदकामाच्या वेळी या वाहिन्यांना धक्का बसून भेगा पडतात. पावसाचे पाणी या वाहिन्यांमध्ये शिरून बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. बऱ्याच ट्रान्स्फॉर्मर्सच्या जागेपाशी कचऱ्याचे ढीग साठल्याने काही आपत्ती आल्यास तात्काळ दुरुस्तीसाठी तिथे पोहोचता येणे कठीण होते. त्यामुळे या काळात सर्वच दृष्टीने वारंवार देखभालीची, आपत्ती व्यवस्थापनाची तत्परता असणे आवश्यक आहे. श्रीपाद कुलकर्णी
भूमिगत वाहिन्यांनाही धोका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Apr 2019, 1:19 pm