नाशिक रोड ते नाशिक या मार्गावरील उपनगर नाका हे जेलरोडशी जोडले गेल्याने मध्यवर्ती ठिकाण झालेलं आहे. येथे भाजी, फळ विक्रेते, टपऱ्या, रिक्षा स्टँड बरोबरच पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र येथे स्वच्छतागृह नसल्याने लोकांची कुचंबणा होताना दिसते. बरेचजण जॉगिंग ट्रॅकमध्ये कुठेही आडोसा शोधताना दिसतात. महापालिकेने येथे तातडीने स्वच्छतागृह बांधून नागरिकांची होणारी कुचंबणा दूर करावी.
उपनगर नाक्यावर स्वच्छतागृह आवश्यक..
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2021, 5:31 am