नगरदिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली. सुट्ट्यांमुळे नागरिक बाहेरगावी प्रवासाला निघाले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढली. मात्र, पोलिसांना त्या दृष्टीने नियोजन केले नाही, त्यामुळे शहरात सर्वत्र वाहतूक कोंडी झाली होती. मार्केट यार्ड चौकात तर कोंडी फोडताना वाहतूक पोलिसही हतबल झालेले पहायला मिळाले. बेशिस्त वाहनचालकांमुळे या कोंडीत भरच पडत होती. यावरून आपसांत वादही होत होते. त्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना मनस्तापालाच समोरे जावे लागले.- अड. शिवाजीराव कराळे
वाहतूक व्यवस्था कोलमडली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Oct 2017, 5:36 am