विद्यापीठ सिग्नल पासून बाणेर रस्त्याकडे जाताना पादचारी मार्गावरून दुचाकी गाड्या भरधाव हॉर्न वाजवत जातात. प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होते. येथे पोलिस असले तरी नियम तोडणाऱ्या या वाहनचालकांकडे ते दुर्लक्ष करतात. या पादचारी मार्गावर रोज जेष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिला फेरफटका मारतात. अशा वेळी एखाद्या दुचाकीने कोणाला फटका बसला तर जागीच ठार होईल एवढा वेग या गाड्यांना असतो. यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे.
पंतप्रधानांची सुरक्षा झाली आताआमच्या सुरक्षेचा काय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2019, 5:46 am