सध्या सर्वत्र स्वच्छ भारत अभियानाचे वारे वाहत आहेत. या अभियानाला महापालिकेकडूनच हरताळ फासला जात आहे. शहरातील लोकांच्या सुविधेसाठी जागोजागी कचरापेट्या बसविण्यात आल्या आहेत. परंतु, महापालिका मुख्यालयाच्या समोरच कचरापेट्या नाहीत. त्यामुळे कचरा फेकावा कुठे, असा प्रश्न येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना पडत आहे. या प्रकाराला दिव्याखालीच अंधार म्हणावे लागेल. - विकास ठवकर
मनपाच्या दिव्याखाली अंधार
Maharashtra Times 9 Apr 2016, 7:05 pm