पालघर : डहाणू तालुक्यातील चिंचणी नागेश्वर पाडा येथील विजेचे खांब आणि वायरींची दुरवस्था झाली आहे. विजेचे खांब वाकल्यामुळे वायरी रस्त्यावर लोंबकळत आहेत. येथून अनेक शाळकरी मुले जात असतात. मात्र ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नाही. २०हून अधिक तक्रारअर्ज करूनही प्रशासन उदासीन आहे. ही समस्या मांडली आहे, ‘मटा सिटिझन रिपोर्टर’ संतोष खोले यांनी.
विजेचे खांब दुरुस्त करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2019, 5:45 am