अ‍ॅपशहर

फक्त ५०० रुपयांसाठी मित्राच्या आईने घेतला १४ वर्षांच्या मुलाचा जीव

फक्त पाचशे रुपयांसाठी मित्राच्या आईने १४ वर्षांच्या मुलाची मारहाण करून हत्या केली. ओडिशातील मयूरभंजमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2020, 2:39 pm
मयूरभंज: ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ५०० रुपये चोरल्याच्या संशयावरून मित्राच्या आईनेच १४ वर्षीय मुलाला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम फक्त ५०० रुपयांसाठी मित्राच्या आईने घेतला १४ वर्षांच्या मुलाचा जीव


कारंजिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किपनोपोशी गावात ही धक्कादायक घटना घडली. राजन बेहरा हा सातवीत शिकणारा विद्यार्थी आपल्या मित्राच्या घरी मंगळवारी गेला होता. काही वेळाने तो घरी परतला. राजन घरी गेला होता त्यावेळी मित्राची आई सस्मिता बेहरा घरी नव्हती. ती परत आल्यानंतर घरातील ५०० रुपये गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. सुरुवातीला तिने मुलाला विचारणा केली. त्यानंतर राजनला घरी बोलावून घेतले. तिथे तिने मुलाला बेदम मारहाण केली. राजन घरी गेला. तिथे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शेजाऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी हत्येप्रकरणी सस्मिता हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुलाचा मृतदेह विच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीनंतर महिलेला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आणखी बातम्या वाचा:

गुजरात: सूरतमध्ये पकडला ड्रग्जचा मोठा साठा

तरुणाने तलवारीसह फोटो केला व्हायरल; पोलीस थेट घरी पोहोचले

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आईला ठार मारण्याची धमकी

३ दिवस बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला; वर्गमित्रानेही केली आत्महत्या

संतापजनक! पत्नी लठ्ठ आहे म्हणून पतीने छळ केला, घराबाहेर काढले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज