वाळूज महानगर : जोगेश्वरी येथे दोन कुटुंबांनी जुन्या वादातून एकमेकांना मारहाण केल्याप्रकरणी दोन्ही कुटुंबाच्या परस्परविरोधी फिर्यादीवरून रविवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम्रपाली बनकर आणि राजू तायडे (दोघे रा. जोगेश्वरी ता. गंगापूर) यांनी वाद झाल्यानंतर एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली.
दोघे एकमेकांचे नातेवाइक आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की आम्रपाली बनकर यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले असून, त्या तीन मुले आणि सासू-सासऱ्यांसह राहतात. शनिवारी रात्री नऊ वाजता आम्रपाली यांना राजू तायडे रस्त्यावर उभा राहून शिवीगाळ करत होता. याचा जाब त्यांच्या सासू चंद्रकलाबाई यांनी विचारला असता त्याने त्यांनाही शिवीगाळ केली. या वेळी आम्रपाली या चंद्रकलाबाईला घरी घेऊन जात असताना रत्ना तायडे यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यावेळी त्यांनी कुऱ्हाडीसारख्या धारदार वस्तू चंद्रकलाबाई यांच्या डोक्यात मारल्याने त्यांचे डोके फुटून रक्त निघाले. त्यानंतर राजू तायडे आणि त्यांची पत्नी रत्ना तायडे यांनी सासू, सुनेला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी आम्रपाली बनकर यांच्या तक्रारीवरुन तायडे दांपत्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू तायडे यांच्या तक्रारीवरून आम्रपाली बनकर व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तक्रारीत जागेच्या वादातून भांडण झाल्याचे सांगितले तसेच बनकर यांनी त्यांची सून उषा गडकर हिला बोलावून मारहाण केली आहे. यावेळी सुवर्णाबाई पंडित व सुभाष कडप यांनी भांडण सोडवल्यावर बाळू गडकर व गौतम गडकर यांनी तेथे येऊन लाकडी दांड्याने मारहाण केली. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दोघे एकमेकांचे नातेवाइक आहेत. याविषयी अधिक माहिती अशी की आम्रपाली बनकर यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले असून, त्या तीन मुले आणि सासू-सासऱ्यांसह राहतात. शनिवारी रात्री नऊ वाजता आम्रपाली यांना राजू तायडे रस्त्यावर उभा राहून शिवीगाळ करत होता. याचा जाब त्यांच्या सासू चंद्रकलाबाई यांनी विचारला असता त्याने त्यांनाही शिवीगाळ केली. या वेळी आम्रपाली या चंद्रकलाबाईला घरी घेऊन जात असताना रत्ना तायडे यांनी शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यावेळी त्यांनी कुऱ्हाडीसारख्या धारदार वस्तू चंद्रकलाबाई यांच्या डोक्यात मारल्याने त्यांचे डोके फुटून रक्त निघाले. त्यानंतर राजू तायडे आणि त्यांची पत्नी रत्ना तायडे यांनी सासू, सुनेला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी आम्रपाली बनकर यांच्या तक्रारीवरुन तायडे दांपत्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू तायडे यांच्या तक्रारीवरून आम्रपाली बनकर व इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी तक्रारीत जागेच्या वादातून भांडण झाल्याचे सांगितले तसेच बनकर यांनी त्यांची सून उषा गडकर हिला बोलावून मारहाण केली आहे. यावेळी सुवर्णाबाई पंडित व सुभाष कडप यांनी भांडण सोडवल्यावर बाळू गडकर व गौतम गडकर यांनी तेथे येऊन लाकडी दांड्याने मारहाण केली. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.