अ‍ॅपशहर

Aurangabad: उच्च शिक्षणासाठी शहरात आला, बाथरूममध्ये आढळला मृतदेह

अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या नागेश्वरवाडीत घडली. कौटुंबिक वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2021, 12:39 pm
औरंगाबाद: उच्च शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाने नागेश्वरवाडी भागात राहत्या खोलीतील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. सागर पोपटराव पोळ (वय - २२, रा. पोळशंकरपूर, गंगापूर, ह. मु नागेश्वरवाडी, औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. कौटुंबिक वादानंतर नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सागर पोपटराव पोळ


अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी सागर हा शहरात आला होता. नागेश्वरवाडी भागात सागर हा एका खोलीत राहत होता. काही दिवसांपासून पोळ कुटुंबात वाद सुरू होते. त्यामुळे त्याला नैराश्य आले होते. कुटुंबीयांनी त्याची समजूत देखील काढली होती. परंतु, गुरुवारी सकाळी त्याने टोकाचे पाऊल उचलले. गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार डी. जे. शिंदे हे तपास करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज