अ‍ॅपशहर

लग्नसोहळा उरकून महिलेसह तिचे कुटुंब घरी परतले, तासाभरातच...

लग्न सोहळ्याहून आल्यानंतर डोंबिवलीतील दावडी येथे शोभा गायकवाड उतरल्या. मात्र, आपल्याकडील दागिन्यांची पिशवी रिक्षातच विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. मानपाडा पोलिसांनी रिक्षाचालकाला शोधून काढले.

Edited byनंदकुमार जोशी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2021, 8:39 am

हायलाइट्स:

  • डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांची जबरदस्त कामगिरी
  • अवघ्या तासाभरात रिक्षाचालकाला काढले शोधून
  • रिक्षात विसरलेले दागिने महिलेला केले परत
  • मानपाडा पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम लग्नसोहळा उरकून महिलेसह तिचे कुटुंब घरी परतले, तासाभरातच...
डोंबिवली : लग्न समारंभ आटोपून गायकवाड कुटुंबीय रिक्षाने घरी परतले. मात्र दागिन्यांची बॅग रिक्षातच राहिली. रिक्षाचा क्रमांक नसल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्वरित सीसीटीव्हीच्या साह्याने रिक्षा शोधून काढली आणि सात तोळे दागिने शोभा गायकवाड यांना परत केले. अवघ्या तासाभरात पोलिसांनी दागिने शोधून परत केल्याने महिलेने मानपाडा पोलिसांचे आभार मानले. तर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.


डोंबिवली पूर्वेत दावडी परिसरात राहणाऱ्या शोभा गायकवाड यांच्या मुलीच्या मैत्रिणीचे काल दादर येथे लग्न होते. या लग्नासाठी सर्व कुटुंबीय दादरला गेले होते. लग्न समारंभ आटोपून रात्री नऊच्या सुमारास गायकवाड कुटुंबीय डोंबिवली रेल्वे स्थानकावर आले आणि तेथून दावडी येथे घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्यांना दावडी येथे सोडून रिक्षाचालक तेथून निघून गेला. घरी गेल्यानंतर त्याना सात तोळे दागिने रिक्षात राहिल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत रिक्षाचालक निघून गेला होता. गायकवाड यांच्याकडे रिक्षाचा क्रमांक नव्हता. त्यांनी तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.

Smart TV Offers: ४० इंचाचा हा स्मार्ट टीव्ही चक्कं १० हजारांपेक्षा कमीमध्ये खरेदी करण्याची संधी, पाहा डिटेल्स

मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांच्या पथकाने त्वरित तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले. या सीसीटीव्हीत ती रिक्षा आढळून आली. रिक्षाच्या वरच्या भागात पांढऱ्या रंगाची पट्टी होती. रिक्षाचा नंबर व त्या पट्टीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला. आधी रिक्षाचालकाने मला याबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने दागिने परत केले आणि आज पोलिसांनी शोभा गायकवाड यांना त्यांचे दागिने परत केले आहेत. त्यामुळे अवघ्या तासाभरात पोलिसांनी दागिने शोधून परत केल्याने महिलेने मानपाडा पोलिसांचे आभार मानले आहेत. तर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज