अ‍ॅपशहर

नगर: शेततळ्यात बुडून ४ भावंडांचा मृत्यू, काय घडलं नेमकं?

शेततळ्यात बुडून चार अल्पवयीन भावंडांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगरमधील श्रीगोंदा येथील बाबुर्डी गावात घडली. यामुळे मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2020, 5:11 pm
अहमदनगर: श्रीगोंदा तालुक्यात शेततळ्यात बुडून चार भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. बाबुर्डी गावात आज, मंगळवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातून गुऱ्हाळावर कामाला आलेल्या या मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम शेततळ्यात बुडून ४ भावांचा मृत्यू


श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी गावात ही घटना घडली. उत्तर प्रदेशातील काही मजूर या गावातील उसाच्या गुऱ्हाळवर कामाला आलेले आहेत. त्यांची मुले मंगळवारी दुपारी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. त्यामध्ये चार भावांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. सात ते पंधरा वयोगटातील ही मुले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृत मुलांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पुढील चौकशी सुरू आहे. ही मुले तळ्यात पोहण्यासाठी गेली आसावीत. तळ्यातील प्लास्टिकच्या कागदामुळे ती घसरून पडली. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

करोनाची भीती; पुण्यात रिक्षाचालकाची, सिन्नरमध्ये वृद्धाची आत्महत्या

दिल्ली हादरली; कोर्टात रेस्ट रूममध्येच महिलेवर बलात्कार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज