गोंदिया : ढासगड(पिपरखारी) कडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला जंगलात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना सोमवारी नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथून अटक केली. आरोपींनी २३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.
चिचगड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ढासगड येथे २३ जूनला २५ ते ३० वर्षीय अनोळखी महिलेला गळ्यावर, डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार करून ठार मारण्यात आले होते. तसेच मृतदेह ओढत नेवून जंगलात टाकण्यात आला होता. पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात हा खुनाचा गुन्हा उघड झाला आहे. १८ जुलै रोजी सदर गुन्ह्यातील मृतक महिला व अज्ञात आरोपींबाबत खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. भंडारा व बुटीबोरी, दुधा, सायकी, जि. नागपूर या ठिकाणी शोध घेऊन पोलिसांनी समीर असलम शेख (वय २६) रा. बावलानगर बुटीबोरी, जि. नागपूर, आसिफ शेरखान पठाण (वय ३५) रा. बाबा मस्तान शॉ वॉर्ड भंडारा, प्रफुल्ल पांडुरंग शिवणकर (वय २५) रा. दुधा (मांगली) जि. नागपूर यांना ताब्यात घेतले.
समीर शेख याचे मृतक महिलेसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तो तिच्यासोबत जुलै २०२०पासून बुटीबोरी येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. परंतु, फेब्रुवारी २०२१मध्ये समीरच्या आई-वडिलांनी दुसऱ्या मुलीशी त्याचे लग्न ठरवून साक्षगंध आटोपले. समीरचे लग्न जुळल्याचे माहीत झाल्याने सदर महिला लग्न करण्याचा हट्ट करीत होती. त्यामुळे आरोपी समीरने मित्राच्या मदतीने तिचा खून केला.
चिचगड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ढासगड येथे २३ जूनला २५ ते ३० वर्षीय अनोळखी महिलेला गळ्यावर, डोक्यावर धारदार शस्त्रांनी वार करून ठार मारण्यात आले होते. तसेच मृतदेह ओढत नेवून जंगलात टाकण्यात आला होता. पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात हा खुनाचा गुन्हा उघड झाला आहे. १८ जुलै रोजी सदर गुन्ह्यातील मृतक महिला व अज्ञात आरोपींबाबत खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. भंडारा व बुटीबोरी, दुधा, सायकी, जि. नागपूर या ठिकाणी शोध घेऊन पोलिसांनी समीर असलम शेख (वय २६) रा. बावलानगर बुटीबोरी, जि. नागपूर, आसिफ शेरखान पठाण (वय ३५) रा. बाबा मस्तान शॉ वॉर्ड भंडारा, प्रफुल्ल पांडुरंग शिवणकर (वय २५) रा. दुधा (मांगली) जि. नागपूर यांना ताब्यात घेतले.
समीर शेख याचे मृतक महिलेसोबत दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तो तिच्यासोबत जुलै २०२०पासून बुटीबोरी येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. परंतु, फेब्रुवारी २०२१मध्ये समीरच्या आई-वडिलांनी दुसऱ्या मुलीशी त्याचे लग्न ठरवून साक्षगंध आटोपले. समीरचे लग्न जुळल्याचे माहीत झाल्याने सदर महिला लग्न करण्याचा हट्ट करीत होती. त्यामुळे आरोपी समीरने मित्राच्या मदतीने तिचा खून केला.