अ‍ॅपशहर

धक्कादायक! प्रेयसीनं शरीरसंबंधांना दिला नकार, रागाच्या भरात प्रियकराने...

प्रेयसीनं शरीरसंबंधांना दिलेला नकार आणि तिचे अन्य तरुणासोबत अफेअर असल्याचा संशय यावरून वाद झाल्यानंतर प्रियकराने रागाच्या भरात महिलेची हत्या केली. दिल्लीतील ओखला परिसरात ही घटना घडली.

Edited byनंदकुमार जोशी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Nov 2021, 11:05 am

हायलाइट्स:

  • प्रेयसीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय
  • प्रेयसीनं शरीरसंबंधांना नकार दिला, रागाच्या भरात केली हत्या
  • दिल्लीच्या ओखला परिसरात सापडला होता महिलेचा मृतदेह
  • प्रियकराला केली अटक, गुन्ह्याची दिली कबुली
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम धक्कादायक! प्रेयसीनं शरीरसंबंधांना दिला नकार, रागाच्या भरात प्रियकराने...
नवी दिल्ली: दिल्लीत एका महिलेच्या हत्येचा उलगडा करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तिचे दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय असतानाच, दोघांमध्ये शरीरसंबंध ठेवण्यावरून वाद झाले. त्यानंतर रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली. या प्रकरणी तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली. ही महिला प्रियकरासोबत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती, अशी माहिती समोर आली आहे.
२१ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या ओखला परिसरात रेल्वे ट्रॅकजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. प्लास्टिकच्या कव्हरमध्ये तिचा मृतदेह झाकलेला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता. दुसरीकडे, मृत महिला कोण आहे याचा तपास पोलीस करत होते. महिलेची ओळख पटवण्यात आल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

वकिलाने युट्युबवरून घेतले 'एमडी'चे धडे

चौकशी दरम्यान वेगळीच माहिती समोर आली. लुटीच्या उद्देशाने तिची हत्या झाली नव्हती, असे तपासात आढळून आले. तिचा मोबाइल गायब होता. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांजवळ चौकशी केली. टेक्निकल सर्व्हिलान्सच्या मदतीने आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना तिच्या मित्राबद्दल माहिती मिळाली. चांद नावाच्या एका व्यक्तीसोबत तिचे मैत्रीचे संबंध होते आणि घटनेच्या आदल्या दिवशी रात्री तो या महिलेसोबत दिसला होता, अशी माहिती मिळाली.

पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून चांदला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने पोलिसांना सांगितले की, तो २०१५ मध्ये बिहारहून दिल्लीला आला होता. तिथे एका कंपनीत काम करतानाच, त्याची मैत्री या महिलेसोबत झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. पण महिलेचे सूरज नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याला काही दिवसांपूर्वी आला. या गोष्टीचा त्याच्या मनात राग होता. आरोपीच्या दाव्यानुसार, तो २१ नोव्हेंबरला महिलेला ओखला परिसरात भेटला. तेथून तो महिलेला घेऊन रेल्वे ट्रॅकजवळील एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिथे महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्याचे तो प्रयत्न करू लागला. मात्र, तिने नकार दिला. याचा त्याला राग आला. त्याने रागाच्या भरात तिच्याच पर्समधून कैची काढली आणि तिची हत्या केली. महिलेचा मोबाइल घेऊन तो पसार झाला. पळून जाताना त्याने कैची आणि मोबाइल फोन नाल्यात फेकून दिल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज