अ‍ॅपशहर

महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला होता, ७ दिवसांनंतर धक्कादायक खुलासा

मध्य प्रदेशातील सुसनेर परिसरातील जंगलात एका महिलेचा मृतदेह सापडला होता. घटनेच्या सात दिवसांनी या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. पतीनेच तिच्या हत्येची सुपारी दिली होती.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jan 2021, 1:23 pm
सुसनेर: मध्य प्रदेशातील सूसनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीपासून पिच्छा सोडवण्यासाठी पतीनेच ५ लाख रुपयांची 'सुपारी' देऊन तिची हत्या घडवून आणली. पोलिसांनी घटनेनंतर सात दिवसांत या हत्याकांडाचा पर्दाफाश केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला होता, ७ दिवसांनंतर धक्कादायक खुलासा


सुसनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पालडा गावाजवळ निर्जन ठिकाणी १४ जानेवारी रोजी पोलिसांना एका महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. तिच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. तिचा गळा आवळून हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आले.

संतापजनक ! १३ वर्षीय मुलीवर शिक्षकाने केला बलात्कार

महिलेची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. आगर-मालवा पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केला. महिलेचे पोस्टर सर्वत्र लावण्यात आले. गावागावात जाऊन चौकशी केली. त्याचवेळी मृत महिला पगारियाची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे एक पथक पगारिया येथे पोहोचले. घरमालकाकडून त्यांनी सर्व माहिती घेतली. महिलेचा पती अर्जुन फौजी आणि अन्य काही जण आले होते. त्यांनी दोन हजार रुपये महिला भाड्याने खोली घेऊन दिली होती. कामाक्षी असे या महिलेचे नाव होते. ती मूळची छिंदवाडा येथील रहिवासी होती, अशी माहिती मिळाली.

पोलिसांनी छिंदवाडा गाठले आणि तिच्या नातेवाइकांना माहिती दिली. कामाक्षीच्या भावाने सांगितले की, 'अर्जुन फौजी याने तिला लग्नाच्या भूलथापा देऊन जाळ्यात ओढले. या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर अर्जुनने एका मंदिरात तिच्याशी लग्न केले.' अर्जुनने तिच्यापासून पिच्छा सोडवण्यासाठी तीन जणांना तिच्या हत्येची सुपारी दिली. पतीने बोलावले आहे, असे सांगून तिघे जण कामाक्षीला कारमधून घेऊन गेले. वाटेत त्यांनी तिचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पालडाजवळील जंगलात त्यांनी तिचा मृतदेह फेकून दिला, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

धक्कादायक! अंधश्रद्धेचे भूत मानगुटीवर; आई-बापानंच केली २ मुलींची हत्या

पतीनेच पाच लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीची हत्या घडवून आणली. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, या हत्येमागील सूत्रधार असलेल्या अर्जुन फौजी याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज