अ‍ॅपशहर

अर्णब गोस्वामींच्या अर्जावर मुंबई कोर्टात १ डिसेंबरला सुनावणी

अन्वय नाईक प्रकरणात अटकेवेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर १ डिसेंबर रोजी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2020, 12:00 pm
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई:अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ४ नोव्हेंबरच्या पहाटे अटक कारवाई होत असताना, महिला पोलिसाला धक्काबुक्की व मारहाण केली आणि पोलिसांना कर्तव्य बजावण्यापासून रोखले, या आरोपाखाली दाखल एफआयआरप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी व त्यांच्या पत्नी सम्यव्रता गोस्वामी यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जांवर आता मुंबई सत्र न्यायालयात १ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arnab goswami: अर्णब गोस्वामी (फाइल फोटो)


यापूर्वी या अर्जांवरील सुनावणी २३ नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर पडली होती. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णव गोस्वामींना अंतरिम जामीन मंजूर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सविस्तर आदेशाची प्रत अद्याप मिळाली नसल्याने त्याआधारे पुन्हा एकदा तहकुबी मागण्यात आली. त्यामुळे सत्र न्यायालयाने सुनावणीसाठी १ डिसेंबरची तारीख निश्चित केली.

अटकेच्या कारवाईनंतर पोलिसांनी गोस्वामी पती-पत्नीविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला. त्यात भारतीय दंड संहितेच्या ३५३ (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यास रोखणे), ५०४ (शांतता भंग होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे), ५०६ (धाकदपटशा करणे) अशी कलमे लावण्यात आली आहेत.

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे छापे; मुंबई, ठाण्यातील ठिकाणांची झाडाझडती

लग्नानंतर नवविवाहित तरुणी अचानक झाली 'गायब'; घरात पाहिलं तर...

भाजप महिला मोर्चाच्या नेत्याची 'अशी' केली फसवणूक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज