म. टा. प्रतिनिधी, पुणे
नागपूर महामार्गाचे काम मिळाल्याचे सांगून भांडवलासाठी घेतलेले एक कोटी रुपये परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल राजन (वय ३१, रा. अमनोरा पार्क टाउन, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रतित अशित शहा (रा. बाणेर), कृतिका अशित शहा (रा.बोरीवली, मुंबई), हितेश बदानी (रा. कोंढवा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून २०१७ ते २०२१ दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. शहा याने त्याला नागपूर महामार्गाचे काम मिळत असल्याचे तक्रारदार राजन यांना सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले. त्या बदल्यात त्यांना ३१ टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखविले. तक्रारदारांनी एक कोटी रुपये दिल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी साइटवर अपघात झाल्याचे सांगितले. त्यासाठी आणखी पैशाची आवश्यकता आहे, असे भासवले. त्यासाठी बँकेकडे कर्जासाठी अर्ज करून मंजुरी मिळाल्याचे बनावट पत्र त्यांना दाखविले. त्यामुळे तक्रारदारांनी आरोपीला पुन्हा १५ लाख रुपये दिले. मात्र, आरोपींनी त्यांना दिलेली रक्कम अद्याप परत केलेली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.
नागपूर महामार्गाचे काम मिळाल्याचे सांगून भांडवलासाठी घेतलेले एक कोटी रुपये परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल राजन (वय ३१, रा. अमनोरा पार्क टाउन, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रतित अशित शहा (रा. बाणेर), कृतिका अशित शहा (रा.बोरीवली, मुंबई), हितेश बदानी (रा. कोंढवा) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून २०१७ ते २०२१ दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. शहा याने त्याला नागपूर महामार्गाचे काम मिळत असल्याचे तक्रारदार राजन यांना सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून एक कोटी रुपये घेतले. त्या बदल्यात त्यांना ३१ टक्के मोबदला देण्याचे आमिष दाखविले. तक्रारदारांनी एक कोटी रुपये दिल्यानंतर पुन्हा काही दिवसांनी साइटवर अपघात झाल्याचे सांगितले. त्यासाठी आणखी पैशाची आवश्यकता आहे, असे भासवले. त्यासाठी बँकेकडे कर्जासाठी अर्ज करून मंजुरी मिळाल्याचे बनावट पत्र त्यांना दाखविले. त्यामुळे तक्रारदारांनी आरोपीला पुन्हा १५ लाख रुपये दिले. मात्र, आरोपींनी त्यांना दिलेली रक्कम अद्याप परत केलेली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.