वसई : नालासोपाऱ्यात एका रिक्षाचालकाची सोमवारी सायंकाळी चाकूने हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्वेकडील संतोषभवन येथे किसन गुप्ता (३२) हा रिक्षाचालक राहत असून त्याच परिसरात तो रिक्षा चालविण्याचे काम करतो. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिक्षा चालवीत असताना एका अज्ञात व्यक्तीने रिक्षा थांबविली. त्याने रिक्षाचालकाचा मोबाइल खेचला. यामध्ये झालेल्या झटापटीत त्याने किसनवर वार केले.