अ‍ॅपशहर

खळबळजनक! एकाच रात्री ३ मैत्रिणी बेपत्ता, कुटुंबीयांना 'हा' संशय

वसईतील नायगाव पूर्वेकडील दळवीपाडा येथील तीन मैत्रिणी एकाच दिवशी बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या तिघींचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2020, 10:56 am
म. टा. वृत्तसेवा, वसई: एकाच दिवशी एकाच परिसरात राहणाऱ्या तीन मैत्रिणी बेपत्ता झाल्याची घटना नायगाव पूर्व दळवीपाडा येथे घडली आहे. याबाबत वालीव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांतर्फे तपास सुरू आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम खळबळजनक! एकाच रात्री ३ मैत्रिणी बेपत्ता, अपहरण केल्याचा संशय


वालीव पोलिस ठाण्याच्या हद्दीत नायगाव पूर्व येथे राहणाऱ्या अनुक्रमे १२, १३ आणि १५ वर्षांच्या तीन अल्पवयीन मुली या एकमेकांच्या मैत्रिणी होत्या. रविवारी रात्रीच्या सुमारास त्यातील एका मुलीचे वडील दुसऱ्या मुलीच्या घरच्यांना मुलीबाबत विचारणा करण्यास गेले असता त्यांना त्यांची मुलगी बेपत्ता असल्याचे समजले. त्यानंतर या दोघींच्या तिसऱ्या मैत्रिणीच्या घरी विचारणा केली असता, ती देखील घरातून बेपत्ता होती. या मुलींच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात तपासणी केली असता त्या न सापडल्याने अखेर त्यांनी वालीव पोलिस ठाणे गाठत मुलींच्या अपहरणाबाबत तक्रार दिली. एकाच दिवशी तीन मुली बेपत्ता झाल्याने कोणीतरी आमिष दाखवून अपहरण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

महिला एसटी बसची वाट बघत होती, कारचालकाने लिफ्ट दिली अन्...

नाशिक: 'तो' पेट्रोल पंपावर आला अन् अवघ्या काही मिनिटांत...

नवी मुंबई: बर्थडे सेलिब्रेशन भोवलं, भाजप नगरसेवकावर गुन्हा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज