अ‍ॅपशहर

गुन्हा मागे घेण्यासाठी दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

ulhasnagar crime news: उल्हासनगर शहरात गुन्हेगारी वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भररस्त्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन तरुणांनी दोघांवर जीवघेणा चाकू हल्ला केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jun 2022, 11:05 am
उल्हासनगर: उल्हासनगर शहरात सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दररोज घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुन्हा एकदा उल्हासनगरमध्ये भररस्त्यात धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हा मागे घेण्यासाठी एका व्यक्तीने दोन तरुणांवर चाकूने हल्ला आहे. तर ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यातील तीन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम knief


उल्हासनगर कॅम्प ३मधील कमला नेहरू नगर येथे श्रीकांत सिंग हा तरुण राहतो. रविवारी रात्री १२.३०च्या सुमारास श्रीकांत सिंग त्याचा मित्र पियुश राय हे दोघे मोटारसायकलवरून कॅम्प नंबर १ येथील झुलेलाल मंदिर चौकात आईस्क्रीम खाण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे बबलू जे.डी, नितीन अहिरे, सुरज बेहनवाल हे तिथे आले. तेव्हा बबलु जे.डी. हा श्रीकांत सिंग याला म्हणाला की, तुम लोगो को ज्यादा चरबी आयी है क्या, मनिष को तुम बोलो की, केस पिछे ले. त्यावरून श्रीकांतने त्याला प्रतिउत्तर देत त्याचं तो बघेल मी त्याला का सांगु, असे म्हणाला. त्याचा राग मनात धरून त्या तिघांनी श्रीकांतला दगड व विटांनी मारण्यास सुरवात केली.

वाचाः पबजी हत्या प्रकरणात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री; मुलाच्या बहिणीने केला धक्कादायक खुलासा

तसंच, सुरज बेहनवाल याने त्याच्या जवळील धारधार चाकूने श्रीकांतच्या छातीवर, उजव्या डोळ्याच्या खाली व डोक्यावर आणि ओठाला वार केले. श्रीकांतला सोडविण्यासाठी मित्र पियुश राय हा मध्ये पडला असता सुरज याने त्याच्याकडील चाकुने पियुश राय याच्या डाव्या हाताचे मनगटाला वार करून खांद्याला मारहाण केली आहे.

वाचाः यूपीमध्ये बुलडोझर कारवाईवरुन वातावरण तापलं; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीशही मैदानात
जखमी श्रीकांत आणि पियुष यांनी आरडाओरड केल्याने ते तिघे तेथुन पळुन गेले. त्यानंतर पियुश रायने मोटारसायकलने मध्यवर्ती रुग्णालय गाठलं. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने कळवा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात बबलु, नितीन अहिरे, सुरज बेहनवाल यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याना बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत या करत आहे.

वाचाः अग्निपथ योजना सरकारसाठीच अग्निपथ ठरेल! लष्कर तज्ज्ञांनी सांगितले भविष्यातील असंख्य धोके

महत्वाचे लेख