अ‍ॅपशहर

किरकोळ कारणावरून चाकूने वार

एपीएमसी भाजी मार्केटमधील दोघा तरुणांनी किरकोळ वादातून एकमेकांवर ब्लेड आणि चाकूने वार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 4 May 2021, 10:45 am
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम किरकोळ कारणावरून चाकूने वार


एपीएमसी भाजी मार्केटमधील दोघा तरुणांनी किरकोळ वादातून एकमेकांवर ब्लेड आणि चाकूने वार केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. मोहम्मद इद्रीस अन्सारी व परवेशकुमार अरुणकुमार पाठक अशी या दोघांची नावे असून दोघेही या हल्ल्यात जखमी झाल्याने एपीएमसी पोलिसांनी दोघांवर उपचार करून दोघांना अटक केली आहे.

आरोपी मोहम्मद व परवेशकुमार हे दोघेही एपीएमसीतील भाजी मार्केटमध्ये काम करून त्याच ठिकाणी राहतात. या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे पर्यवसान भांडणात झाल्यानंतर त्यांनी एकमेकांवर चाकू व ब्लेडने वार केले. यात दोघे जखमी झाल्याने एपीएमसी पोलिसांनी दोघांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार केले. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज