म. टा. वृत्तसेवा, वर्धा: मास्क का लावले नाही, अशी विचारणा करणाऱ्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दोन युवकांनी मारहाण केली. ही खळबळजनक घटना आर्वीच्या शिवाजी चौकात घडली. या प्रकरणी सोयल नूर हसन शेख (१७) आणि आवेश खान जाबिर खान पठाण (२१) रा. पिंपरी पुनर्वसन या दोन युवकांना अटक केली आहे.
करोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढू लागल्याने निर्बंध कडक करण्यात आले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर सक्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या नियमाची अंमलबजावणी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक हे मंगळवारी दुपारी अडीच वाजातच्या सुमारास करीत असताना शेख आणि पठाण हे दोघे विनामास्क दिसून आले. धार्मिक यांनी त्यांना मास्क लावण्याविषयी सांगितले. त्यांनी मास्क लावण्यास नकार देऊन अरेवारी सुरू केली.
एवढ्यावरच न थांबता चौकातच मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहताच घटनास्थयी लोकांनी गर्दी केली. हे पाहताच मारहाण करणारे पळायचा प्रयत्न करू लागले. पण, धार्मिक यांनी एकाला पकडून ठेवले. पोलिसांनी माहिती देताच सदर युवकाला अटक करण्यात आली. धार्मिक यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
करोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढू लागल्याने निर्बंध कडक करण्यात आले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर सक्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या नियमाची अंमलबजावणी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक हे मंगळवारी दुपारी अडीच वाजातच्या सुमारास करीत असताना शेख आणि पठाण हे दोघे विनामास्क दिसून आले. धार्मिक यांनी त्यांना मास्क लावण्याविषयी सांगितले. त्यांनी मास्क लावण्यास नकार देऊन अरेवारी सुरू केली.
एवढ्यावरच न थांबता चौकातच मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहताच घटनास्थयी लोकांनी गर्दी केली. हे पाहताच मारहाण करणारे पळायचा प्रयत्न करू लागले. पण, धार्मिक यांनी एकाला पकडून ठेवले. पोलिसांनी माहिती देताच सदर युवकाला अटक करण्यात आली. धार्मिक यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.