हरदोई: उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एका ५० वर्षीय व्यक्तीची हत्या झाली होती. या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या पत्नीनेच प्रियकरांच्या मदतीने त्याची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. महिलेचे तिघा जणांसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. त्याला पतीचा विरोध होता. त्यांनी हा अडथळा दूर करण्याचा कट रचला. कुऱ्हाडीने वार करून त्यांनी हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने पतीची हत्या केल्यानंतर या हत्येचा आरोप एका प्रियकरावर केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्नीच असल्याचे उघड झाले. पोलिसांनी हत्येच्या प्रकरणात पत्नीसह तिच्या तिन्ही प्रियकरांना अटक केली आहे.
हरदोई जिल्ह्यातील रामपुर मझियारा येथील रहिवासी राम अवतार कश्यप याच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याची पत्नी आणि प्रियकर ऋषिपाल, विजयपाल आणि रामसेवक या तिघांनाही अटक केली आहे. ३१ जानेवारी रात्री राम अवतार कश्यप याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती. या प्रकरणात मृताची पत्नी चमेली आणि तिचे प्रियकर ऋषिपाल आणि अन्य दोघांना अटक केली आहे. या महिलेचे तिघांसोबत अनैतिक संबंध होते. ही महिला गेल्या वर्षभरापासून ऋषिपालसोबत राहत होती. २० दिवसांपूर्वी महिला आपल्या पतीच्या घरी आली. ऋषिपाल हा तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी आला. तिथे राम अवतार याच्यासोबत वाद झाला. महिलेने आपल्या प्रियकरांच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट रचला. घराबाहेर राम अवतार याची हत्या केली.
हरदोई जिल्ह्यातील रामपुर मझियारा येथील रहिवासी राम अवतार कश्यप याच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी त्याची पत्नी आणि प्रियकर ऋषिपाल, विजयपाल आणि रामसेवक या तिघांनाही अटक केली आहे. ३१ जानेवारी रात्री राम अवतार कश्यप याची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती. या प्रकरणात मृताची पत्नी चमेली आणि तिचे प्रियकर ऋषिपाल आणि अन्य दोघांना अटक केली आहे. या महिलेचे तिघांसोबत अनैतिक संबंध होते. ही महिला गेल्या वर्षभरापासून ऋषिपालसोबत राहत होती. २० दिवसांपूर्वी महिला आपल्या पतीच्या घरी आली. ऋषिपाल हा तिला घेऊन जाण्यासाठी तिच्या घरी आला. तिथे राम अवतार याच्यासोबत वाद झाला. महिलेने आपल्या प्रियकरांच्या मदतीने त्याच्या हत्येचा कट रचला. घराबाहेर राम अवतार याची हत्या केली.