डॉ. प्रसाद कर्णिक
ठाणे खाडीने गेल्या दोन वेळी मारलेल्या गप्पांतून वाचकवर्गाच्या मनात ठाणे खाडीबद्दल एक वेगळं स्थान निर्माण झालं असणार. खाडीची तीस वर्षांपूर्वीची स्थिती (ज्यांना तेव्हाची खाडी माहीत नव्हती त्यांच्यासाठी) आणि आज जाता-येता बाहेरून बघतो ती अवस्था यात खूप अंतर आहे हेही सर्वांच्या लक्षात आलंय. याला जबाबदार कोण, हे असं का व कसं झालं या फंदात आजतरी ही माय पडणार नाही. यातील अनेक मुद्द्यांवर ती बहुधा स्वतंत्रपणे बोलेलच आपल्याशी; पण आज तिला आठवतोय तो असा एक 'खास' जण जो तुमच्या-माझ्यापेक्षा (किमान माझ्यापेक्षातरी) वेगळा आहे. लेखाचं शीर्षक वाचून चाणाक्ष वाचक कदाचित समजले असतीलही काय बोलणार आहे ते! मागे लिहिल्यानुसार, माझ्या पदवीच्या संशोधनासाठी या माझ्या 'आईने' माझ्याकडे पाठ फिरवली होती, त्याच्या दहाएक वर्ष आधी, मी दुसऱ्या एका पदवीसाठी आपली खाडी व शहरातील काही तलाव (ठाण्यातील जलस्रोत) यावर काम करत होतो तेव्हाची गोष्ट, जेव्हा शीर्षकात उल्लेखलेला मुलगा मला भेटला. अर्थात त्यानंतर, असे 'वेगळे' मनुष्यप्राणी मला अनेकदा बघायला मिळाले; परंतु ही माझी पहिली वेळ होती- खरंतर ठाणे खाडी मला बोटाला धरून असंख्य नवीन गोष्टी शिकवत होती, त्यातली एक 'नवीन' बाब. गमतीचा भाग हा की, ती माझी पदवी मला आयुष्यात कधीच मिळाली नाही (त्यावर्षी आमची लेखी परीक्षा झाली नाही आणि नंतर विद्यापीठातून आमच्या विषयातील विद्यार्थी/शिक्षकांना आजपावेतो ती पदवी प्राप्त करता आली नाही; तो अभ्यासक्रम बंद केला गेला आमच्या विषयापुरता, ते अलाहिदा); परंतु, त्यानिमित्ताने ही 'माई' मला खूप शिकविती झाली आणि बाकी काही नसले तरी आपल्याला आजचा हा लेख त्यामुळे वाचायला मिळाला हे नक्की. तर सुहृदहो, ठाणे खाडीवर अनन्वित अत्याचार झालेत, प्रदूषणामुळे तिची पूर्वीची संपन्नता विपन्नावस्थेत रुपांतरीत झालेय, याबद्दल दुमत नाही. तरीही, मागील लेखात लिहिल्याप्रमाणे, आजही या पाण्यात प्राणीसंपदा- कमी प्रमाणात का होईना- अस्तित्वात आहे हेही खरे. ही माझी, नव्हे आपली 'आई' म्हटली तरी आपण तिला फारसं ओळखू शकलो नाही, असंच मी म्हणेन. नमनाला घडाभर तेल पुरे! थेट किस्साच सांगतो.
मंडळी, ठाणे खाडीत अभ्यासाची सुरुवात करताना माझ्या एका हितचिंतकाने एक छोटा, दहा-बारा वर्षांचा मुलगा मदतनीस म्हणून दिला. सुरुवातीला माझ्यातील 'मास्तराने' त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. अशिक्षित, अनाडी पोर असं मी मानलं. खाडीतील सजीव प्राण्यांचा अभ्यास करताना काही प्राणी मी गोळा करत असे व जिवंत जपून ठेवत असे. हे सर्व प्राणी हे 'पोर' मला पकडून देत असे. यापैकी 'निवटी' ही प्रजाती तो हमखास पहिल्या फटक्यात काढून देत होता. मला हे मान्य करायला अजिबात संकोच वाटत नाही की इतक्या वर्षांत मी एकही निवट पकडू शकलो नव्हतो आणि हा छोटासा मुलगा मी नाव घ्यायची खोटी, तो अफलातून जीव (त्याबद्दल खाडीआई सांगेलच सविस्तर कधीतरी) माझ्याकडे सुपूर्द! विचारल्यावर मला म्हणतो, "सर, त्यां निवट्याचे बुडबुडे येतात ना चिखलात? मग कळतं". अहो साहेब, त्या चिखलावर असंख्य 'बुडबुडे', त्यापैकी निवट्याचे कुठले हे मला शेवटपर्यंत कळले नाही! तो लहान्या बहुधा प्रत्येक बुडबुडा 'वाचू' शकत होता!! कमाल आहे नाही? माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलला ना अहो. तो निरक्षर, अशिक्षित लहानगा न राहता माझा वाटाड्या- खरं तर गुरूच म्हणायला पाहिजे- झाला होता. त्याला जेव्हा मी खोदून, खोदून विचारलं तरीही त्याला ते सांगता आलं नाही मात्र (ते काम आम्ही शिक्षक करतो ना). ग्रेट! याच मुलाने आणखी एकदा माझा वर्ग घेतला. मी एका खडकाखाली चिम्बोरी (काळ्या पाठीचा खेकडा) शोधत होतो. तर हे महाशय मला म्हणाले की या नाही, तर त्या दगडाखाली चिंबोरी 'घावेल'. तो अर्थातच 'सही' होता. पुढे म्हणतो कसा, "मिनीच (मीच) काल तिथे ठेवली होती; चिंबोर॑ जागा बदलत नाय", आता बोला.... आता या मुलाला खाडी तोंडपाठ आहे, म्हणा ना! काय निरीक्षण आहे, काय अभ्यास आहे. मग भले त्याला पोटा-पाण्यासाठी खाडीत जावे लागत असेल, नाही तर मजा म्हणून. हे निसर्गावर अवलंबून असणारे प्रजाजन या प्रत्येक नैसर्गिक संसाधानाशी एकरूप झालेले असतात, नाही? असे अनेक 'अवलिये' भेटले या आईच्या अंतर्मनात शिरण्याचा प्रयत्न करताना. त्याबद्दल मागाहून आणखी गप्पा मारूच पण आजचा आपला मुद्दा आहे तो निसर्गाशी नाळ जुळण्याचा. आम्ही सुशिक्षित, उच्च-शिक्षित लोक स्वतःला खूप शहाणे समजतो. मी आमचे महत्त्व कमी नाही करत, परंतु आपल्या समाजात केवळ शिक्षणाला, तथाकथित उच्च कामाला, महत्त्व आहे. यात, आमचे हे 'मूलनिवासी' दुर्लक्षित होतात; त्यांचे महत्व अधोरेखित व्हायला हवे. मला खात्री आहे, हा अज्ञात मुलगा आता चाळीशीचा असेल, कदाचित शहरात नोकरीदेखील करत असेल, आता त्याचा खाडीशी संबंध असेल वा नसेलही. मात्र, हा जीव, स्वतःहून खाडीत कचरा कधीच टाकणार नाही. खाडी प्रदूषित करण्याचा विचारही करणार नाही. जर तो असा वागू शकतो, तर मग मी का नाही? मंडळी, हे सहज शक्य आहे. म्हणजे, त्याच्यासारखी खाडी मी भले 'वाचू' शकणार नाही; पण वाचवू तर नक्कीच शकतो ना? आपण काय करतो, तर माझा या गोष्टीशी थेट संबंध कुठे आहे की मी तिच्या भल्याचे बघावे? फार तर खाडीतील चिंबोरी (भरभक्कम पैसे देवून) मी विकत घेईन पण जिथे तिचे घर आहे त्याकडे पाहावे, त्याचा थोडासा विचार करावा हे माझ्या गावी नसते. थोडासा या माझ्या निसर्गमायेशी तद्रूप होण्याचा प्रयत्न करूयात का?...
ठाणे खाडीने गेल्या दोन वेळी मारलेल्या गप्पांतून वाचकवर्गाच्या मनात ठाणे खाडीबद्दल एक वेगळं स्थान निर्माण झालं असणार. खाडीची तीस वर्षांपूर्वीची स्थिती (ज्यांना तेव्हाची खाडी माहीत नव्हती त्यांच्यासाठी) आणि आज जाता-येता बाहेरून बघतो ती अवस्था यात खूप अंतर आहे हेही सर्वांच्या लक्षात आलंय. याला जबाबदार कोण, हे असं का व कसं झालं या फंदात आजतरी ही माय पडणार नाही. यातील अनेक मुद्द्यांवर ती बहुधा स्वतंत्रपणे बोलेलच आपल्याशी; पण आज तिला आठवतोय तो असा एक 'खास' जण जो तुमच्या-माझ्यापेक्षा (किमान माझ्यापेक्षातरी) वेगळा आहे. लेखाचं शीर्षक वाचून चाणाक्ष वाचक कदाचित समजले असतीलही काय बोलणार आहे ते! मागे लिहिल्यानुसार, माझ्या पदवीच्या संशोधनासाठी या माझ्या 'आईने' माझ्याकडे पाठ फिरवली होती, त्याच्या दहाएक वर्ष आधी, मी दुसऱ्या एका पदवीसाठी आपली खाडी व शहरातील काही तलाव (ठाण्यातील जलस्रोत) यावर काम करत होतो तेव्हाची गोष्ट, जेव्हा शीर्षकात उल्लेखलेला मुलगा मला भेटला. अर्थात त्यानंतर, असे 'वेगळे' मनुष्यप्राणी मला अनेकदा बघायला मिळाले; परंतु ही माझी पहिली वेळ होती- खरंतर ठाणे खाडी मला बोटाला धरून असंख्य नवीन गोष्टी शिकवत होती, त्यातली एक 'नवीन' बाब. गमतीचा भाग हा की, ती माझी पदवी मला आयुष्यात कधीच मिळाली नाही (त्यावर्षी आमची लेखी परीक्षा झाली नाही आणि नंतर विद्यापीठातून आमच्या विषयातील विद्यार्थी/शिक्षकांना आजपावेतो ती पदवी प्राप्त करता आली नाही; तो अभ्यासक्रम बंद केला गेला आमच्या विषयापुरता, ते अलाहिदा); परंतु, त्यानिमित्ताने ही 'माई' मला खूप शिकविती झाली आणि बाकी काही नसले तरी आपल्याला आजचा हा लेख त्यामुळे वाचायला मिळाला हे नक्की. तर सुहृदहो, ठाणे खाडीवर अनन्वित अत्याचार झालेत, प्रदूषणामुळे तिची पूर्वीची संपन्नता विपन्नावस्थेत रुपांतरीत झालेय, याबद्दल दुमत नाही. तरीही, मागील लेखात लिहिल्याप्रमाणे, आजही या पाण्यात प्राणीसंपदा- कमी प्रमाणात का होईना- अस्तित्वात आहे हेही खरे. ही माझी, नव्हे आपली 'आई' म्हटली तरी आपण तिला फारसं ओळखू शकलो नाही, असंच मी म्हणेन. नमनाला घडाभर तेल पुरे! थेट किस्साच सांगतो.
मंडळी, ठाणे खाडीत अभ्यासाची सुरुवात करताना माझ्या एका हितचिंतकाने एक छोटा, दहा-बारा वर्षांचा मुलगा मदतनीस म्हणून दिला. सुरुवातीला माझ्यातील 'मास्तराने' त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. अशिक्षित, अनाडी पोर असं मी मानलं. खाडीतील सजीव प्राण्यांचा अभ्यास करताना काही प्राणी मी गोळा करत असे व जिवंत जपून ठेवत असे. हे सर्व प्राणी हे 'पोर' मला पकडून देत असे. यापैकी 'निवटी' ही प्रजाती तो हमखास पहिल्या फटक्यात काढून देत होता. मला हे मान्य करायला अजिबात संकोच वाटत नाही की इतक्या वर्षांत मी एकही निवट पकडू शकलो नव्हतो आणि हा छोटासा मुलगा मी नाव घ्यायची खोटी, तो अफलातून जीव (त्याबद्दल खाडीआई सांगेलच सविस्तर कधीतरी) माझ्याकडे सुपूर्द! विचारल्यावर मला म्हणतो, "सर, त्यां निवट्याचे बुडबुडे येतात ना चिखलात? मग कळतं". अहो साहेब, त्या चिखलावर असंख्य 'बुडबुडे', त्यापैकी निवट्याचे कुठले हे मला शेवटपर्यंत कळले नाही! तो लहान्या बहुधा प्रत्येक बुडबुडा 'वाचू' शकत होता!! कमाल आहे नाही? माझा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पार बदलला ना अहो. तो निरक्षर, अशिक्षित लहानगा न राहता माझा वाटाड्या- खरं तर गुरूच म्हणायला पाहिजे- झाला होता. त्याला जेव्हा मी खोदून, खोदून विचारलं तरीही त्याला ते सांगता आलं नाही मात्र (ते काम आम्ही शिक्षक करतो ना). ग्रेट! याच मुलाने आणखी एकदा माझा वर्ग घेतला. मी एका खडकाखाली चिम्बोरी (काळ्या पाठीचा खेकडा) शोधत होतो. तर हे महाशय मला म्हणाले की या नाही, तर त्या दगडाखाली चिंबोरी 'घावेल'. तो अर्थातच 'सही' होता. पुढे म्हणतो कसा, "मिनीच (मीच) काल तिथे ठेवली होती; चिंबोर॑ जागा बदलत नाय", आता बोला.... आता या मुलाला खाडी तोंडपाठ आहे, म्हणा ना! काय निरीक्षण आहे, काय अभ्यास आहे. मग भले त्याला पोटा-पाण्यासाठी खाडीत जावे लागत असेल, नाही तर मजा म्हणून. हे निसर्गावर अवलंबून असणारे प्रजाजन या प्रत्येक नैसर्गिक संसाधानाशी एकरूप झालेले असतात, नाही? असे अनेक 'अवलिये' भेटले या आईच्या अंतर्मनात शिरण्याचा प्रयत्न करताना. त्याबद्दल मागाहून आणखी गप्पा मारूच पण आजचा आपला मुद्दा आहे तो निसर्गाशी नाळ जुळण्याचा. आम्ही सुशिक्षित, उच्च-शिक्षित लोक स्वतःला खूप शहाणे समजतो. मी आमचे महत्त्व कमी नाही करत, परंतु आपल्या समाजात केवळ शिक्षणाला, तथाकथित उच्च कामाला, महत्त्व आहे. यात, आमचे हे 'मूलनिवासी' दुर्लक्षित होतात; त्यांचे महत्व अधोरेखित व्हायला हवे. मला खात्री आहे, हा अज्ञात मुलगा आता चाळीशीचा असेल, कदाचित शहरात नोकरीदेखील करत असेल, आता त्याचा खाडीशी संबंध असेल वा नसेलही. मात्र, हा जीव, स्वतःहून खाडीत कचरा कधीच टाकणार नाही. खाडी प्रदूषित करण्याचा विचारही करणार नाही. जर तो असा वागू शकतो, तर मग मी का नाही? मंडळी, हे सहज शक्य आहे. म्हणजे, त्याच्यासारखी खाडी मी भले 'वाचू' शकणार नाही; पण वाचवू तर नक्कीच शकतो ना? आपण काय करतो, तर माझा या गोष्टीशी थेट संबंध कुठे आहे की मी तिच्या भल्याचे बघावे? फार तर खाडीतील चिंबोरी (भरभक्कम पैसे देवून) मी विकत घेईन पण जिथे तिचे घर आहे त्याकडे पाहावे, त्याचा थोडासा विचार करावा हे माझ्या गावी नसते. थोडासा या माझ्या निसर्गमायेशी तद्रूप होण्याचा प्रयत्न करूयात का?...