>> दीपक चित्रे
गेल्या पाच वर्षांत ६ लाख वधूंना जयललिता यांनी सोने आणि ५० हजार रु. सरकारी अहेर दिला. याच अहेराची परतफेड महिला मतदारांनी आणि त्यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या त्यांच्या कुटुंब सदस्यांनी केली...
काळ्या काचा लावलेली सुरक्षारक्षकांच्या वेढ्यातील टेम्पोट्रॅक्स रस्त्यावर येताच आजुबाजूच्या सर्व घरांतील महिला-तरुणी-मुली हातातील काम सोडून रस्त्यावर धावत येणार...काचा बंद असल्या तरी ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटच्या दिशेने झेंडूची फुले व पांढरी फुले उधळणार...काचांआडून हात हलवणारी धुसर छबी नजरेआड झाल्यानंतरच कृतकृत्य होऊन घरी परतणार...अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांना तामिळनाडू निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळण्याचे हेच एक प्रमुख कारण. भ्रष्टाचाराचे आरोप, राजेशाही जीवनशैली आणि गोतावळ्याचे राजकारण यावरून राज्यातील राजकारणात नेहमीच टीकेच्या धनी होणाऱ्या जयललिता यांना राज्यातील महिलांचा मात्र नेहमीच पाठिंबा मिळत गेला आणि २०१६च्या निवडणुकीतील जयललिता यांचे यश महिला मतदारांनीच मिळवून दिल्याचा राजकीय धुरिणांचे मत आहे.
७ कोटी २१ लाख ४७ हजार लोकसंख्या असलेल्या तामिळनाडूमध्ये ३ कोटी ६१ लाख ३७ हजार इतकी महिलांची संख्या आहे. तामिळनाडूच्या घरोघरी महिलांचा शब्द प्रमाण आहे. यंदाच्या निवडणुकीत तर महिलांनी आपले बळ अधिकच एकवटले. राज्याच्या इतिहासात प्रथमच यंदा मतदानात महिलांनी पुरुषांना मागे टाकले. हीच महिलाशक्ती जयललिता यांना विजयापर्यंत घेऊन गेली. देशभरातील असंख्य संस्थांच्या व न्यूज चॅनेलच्या एक्झिट पोलपैकी केवळ दोन संस्थांनी तामिळनाडूमध्ये जयललिता पुन्हा सत्तेवर येतील, असे भाकित वर्तवले होते. याउलट मतदानपूर्व चाचण्यांमध्ये मात्र जयललिता यांचा विजय होईल, असा निष्कर्ष काढला जात होता. मतदानाचे ७४ टक्के इतके प्रचंड प्रमाण पाहिल्यानंतर हा वाढता टक्का जयललिता यांच्या विरोधातील आहे, असाच राजकीय तज्ज्ञांचा होरा होता. मात्र तो साफ चुकीचा ठरला.
मोफत काय देणार, हा नेहमीच तामिळनाडूतील जनमत बाजूने खेचण्याचा महत्त्वाचा मुद्दा ठरतो आणि जयललिता यांनी सर्वच घटकांसाठी अशा मोफत वस्तूंची रेलचेल ठेवली. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रत्येकी चार बकऱ्या आणि एक गाय, मिक्सर ग्राइंडर आणि फॅन, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी तीन शालेय गणवेश, बॅगा अशा विविध योजना मोफत आखून पाच वर्षांत त्यांची नीट अंमलबजावणी केली. सरकारी शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, कंपासपेट्या, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सायकल व लॅपटॉपचे वाटप केले. गरीब कुटुंबांना या छोट्या गोष्टींचे मोठे महत्त्व जाणवत असल्याचे हेरूनच जयललिता यांनी या सर्व सरकारी योजना भ्रष्टाचारमुक्त राहण्यासाठी खास प्रयत्न केले. या योजनाच जयललिता यांना पुन्हा विजयापर्यंत घेऊन गेल्या. दरमहा २० किलो मोफत तांदूळ, मोफत सॅनिटरी नॅपकिन, अम्मा बेबीकेअर वस्तू, बाळांना दूध पाजण्यासाठी महिलांसाठी खास सोय अशा नवनवीन गोष्टींतून जयललिता यांनी महिलांच्या मनात विशेष स्थान मिळवले. सर्वात सोनेरी कळस चढवला, तो प्रत्येक वधूला विवाहासाठी चार ग्रॅम सोने देण्याच्या योजनेने. गेल्या पाच वर्षांत सुमारे ६ लाख वधूंना जयललिता यांनी सोने आणि ५० हजार रु. सरकारी अहेर दिला. याच अहेराची परतफेड महिला मतदारांनी आणि त्यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या त्यांच्या कुटुंबसदस्यांनी केली आहे.
गेल्या पाच वर्षांत ६ लाख वधूंना जयललिता यांनी सोने आणि ५० हजार रु. सरकारी अहेर दिला. याच अहेराची परतफेड महिला मतदारांनी आणि त्यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या त्यांच्या कुटुंब सदस्यांनी केली...
काळ्या काचा लावलेली सुरक्षारक्षकांच्या वेढ्यातील टेम्पोट्रॅक्स रस्त्यावर येताच आजुबाजूच्या सर्व घरांतील महिला-तरुणी-मुली हातातील काम सोडून रस्त्यावर धावत येणार...काचा बंद असल्या तरी ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटच्या दिशेने झेंडूची फुले व पांढरी फुले उधळणार...काचांआडून हात हलवणारी धुसर छबी नजरेआड झाल्यानंतरच कृतकृत्य होऊन घरी परतणार...अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांना तामिळनाडू निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजय मिळण्याचे हेच एक प्रमुख कारण. भ्रष्टाचाराचे आरोप, राजेशाही जीवनशैली आणि गोतावळ्याचे राजकारण यावरून राज्यातील राजकारणात नेहमीच टीकेच्या धनी होणाऱ्या जयललिता यांना राज्यातील महिलांचा मात्र नेहमीच पाठिंबा मिळत गेला आणि २०१६च्या निवडणुकीतील जयललिता यांचे यश महिला मतदारांनीच मिळवून दिल्याचा राजकीय धुरिणांचे मत आहे.
७ कोटी २१ लाख ४७ हजार लोकसंख्या असलेल्या तामिळनाडूमध्ये ३ कोटी ६१ लाख ३७ हजार इतकी महिलांची संख्या आहे. तामिळनाडूच्या घरोघरी महिलांचा शब्द प्रमाण आहे. यंदाच्या निवडणुकीत तर महिलांनी आपले बळ अधिकच एकवटले. राज्याच्या इतिहासात प्रथमच यंदा मतदानात महिलांनी पुरुषांना मागे टाकले. हीच महिलाशक्ती जयललिता यांना विजयापर्यंत घेऊन गेली. देशभरातील असंख्य संस्थांच्या व न्यूज चॅनेलच्या एक्झिट पोलपैकी केवळ दोन संस्थांनी तामिळनाडूमध्ये जयललिता पुन्हा सत्तेवर येतील, असे भाकित वर्तवले होते. याउलट मतदानपूर्व चाचण्यांमध्ये मात्र जयललिता यांचा विजय होईल, असा निष्कर्ष काढला जात होता. मतदानाचे ७४ टक्के इतके प्रचंड प्रमाण पाहिल्यानंतर हा वाढता टक्का जयललिता यांच्या विरोधातील आहे, असाच राजकीय तज्ज्ञांचा होरा होता. मात्र तो साफ चुकीचा ठरला.
मोफत काय देणार, हा नेहमीच तामिळनाडूतील जनमत बाजूने खेचण्याचा महत्त्वाचा मुद्दा ठरतो आणि जयललिता यांनी सर्वच घटकांसाठी अशा मोफत वस्तूंची रेलचेल ठेवली. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रत्येकी चार बकऱ्या आणि एक गाय, मिक्सर ग्राइंडर आणि फॅन, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी तीन शालेय गणवेश, बॅगा अशा विविध योजना मोफत आखून पाच वर्षांत त्यांची नीट अंमलबजावणी केली. सरकारी शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, कंपासपेट्या, अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सायकल व लॅपटॉपचे वाटप केले. गरीब कुटुंबांना या छोट्या गोष्टींचे मोठे महत्त्व जाणवत असल्याचे हेरूनच जयललिता यांनी या सर्व सरकारी योजना भ्रष्टाचारमुक्त राहण्यासाठी खास प्रयत्न केले. या योजनाच जयललिता यांना पुन्हा विजयापर्यंत घेऊन गेल्या. दरमहा २० किलो मोफत तांदूळ, मोफत सॅनिटरी नॅपकिन, अम्मा बेबीकेअर वस्तू, बाळांना दूध पाजण्यासाठी महिलांसाठी खास सोय अशा नवनवीन गोष्टींतून जयललिता यांनी महिलांच्या मनात विशेष स्थान मिळवले. सर्वात सोनेरी कळस चढवला, तो प्रत्येक वधूला विवाहासाठी चार ग्रॅम सोने देण्याच्या योजनेने. गेल्या पाच वर्षांत सुमारे ६ लाख वधूंना जयललिता यांनी सोने आणि ५० हजार रु. सरकारी अहेर दिला. याच अहेराची परतफेड महिला मतदारांनी आणि त्यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या त्यांच्या कुटुंबसदस्यांनी केली आहे.