प्रा. निशा पाटील
नाशिकमधील सांस्कृतिक व वाङमयीन क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था म्हणजे लोकहितवादी मंडळ. कालांतराने सांस्कृतिक व सामाजिक, शैक्षणिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था स्थापन झाल्या. पण, आजही नाट्यस्पर्धेत लोकहितवादी मंडळाचे नाव चमकते.
क्षनिष्ठ राजकारणापासून अलिप्त राहून ज्ञान कला व साहित्य यांचा प्रसार, पुरस्कार व विचार करण्यासाठी या संस्थेची २ सप्टेंबर १९५० रोजी स्थापना करण्यात आली. संस्थेच्या उद्घाटनाचा औपचारिक समारंभ ४ ऑक्टोबर १९५० रोजी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. उद्घाटन समारंभाच्यावेळी महामहोपाध्याय पोतदारांचे ब्रिटिश राजवटींची देणीघेणी या विषयावर व्याख्यान झाले होते. सदुसष्ट वर्षांपूर्वी आकाशवाणी, वृत्तपत्रे, व्याख्याने हीच ज्ञानप्रसाराची व करमणुकीची साधने असल्यामुळे लोकजीवनात सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी व साहित्यविषयी अभिरूची निर्माण करण्यासाठी लोकहितवादी मंडळाने पुढाकार घेतला होता. तसेच साहित्यातील नवप्रवाहांचा परिचय करून देण्याचाही लोकहितवादी मंडळाचा उद्देश होता. स्थापनेनंतरच्या पहिल्याच वर्षात शारदीय महोत्सवात प्रा. ना.सी.फडके यांचे ललित कथेचे सामर्थ्य आणि प्रा. वि. ह. कुलकर्णी यांचे विनोद या विषयावरील व्याख्यान आयोजित केले. मोघुबाई कुर्डीकर यांचा गायनाचा कार्यक्रम आणि प्रसिध्द अभिनेत्री स्नेहलता प्रधान यांचे फिल्म्स ऑफ टुडे, मालतीबाई बेडेकर यांचे स्त्री कालची आजची उद्याची या विषयावरील व्याख्याने आयोजित करण्यात आली. यावरून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा लोकहितवादी मंडळाचा उद्देश होता हे स्पष्टपणे दिसते.
१९५२ साली संस्थेने वासंतिक नाट्य महोत्सव आयोजित केला होता त्याचे नियोजन ब. चिं सहस्त्रबुध्दे यांनी केले होते. या नाट्यमहोत्सवात साष्टांग नमस्कार, पारध, अंमलदार, निशिकांताची नवरी, भावबंधन ही नाटके नाशिककरांना पहायला मिळाली. शारदीय महोत्सवात नामांकित लेखक व समीक्षक यांची व्याख्यानमाला हे लोकहितवादी मंडळाचे महत्त्वाचे कार्य होते. वृत्तपत्रे व आकाशवाणी ही दोनच प्रसारमाध्यमे त्या काळी असल्याने अशा व्याख्यानांचा लाभ घेण्यासाठी नाशिककर गर्दी करीत असतं. उच्च अभिरूची निर्माण करणे या उद्देशाप्रमाणेच नवविचारांचा प्रसार करणे आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणणे या दृष्टीनेही मंडळाचे कार्य सुरू होते. शकुंतला परांजपे यांचे संततीनियमन या विषयावरील व्याख्यान ठेवण्यामागे मंडळाची ही भूमिका स्पष्टपणे दिसते.
लोकहितवादी मंडळाच्या वतीने विविध व्याख्यानांबरोबरच परिसंवाद, चर्चा, अभिरूप न्यायालय, नाट्यवाचन, काव्यवाचन, व्यवसाय मार्गदर्शन, अभिनयासह सप्रयोग व्याख्याने अशा अभिनव कार्यक्रमांचा नाशिककरांना लाभ मिळे.
साधना हा एक विशेष उपक्रम लोकहितवादी मंडळाने सुरू केला होता. मंडळाचे कार्यकर्ते व अभ्यासू नागरिक एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करीत असत. तसेच नाट्यवाचन, संगीत सभा, प्रश्नमाला असे अभिनव कार्यक्रमही राबविले जात. प्रौढ नागरिक व विद्यार्थी वर्गासाठी मसाप वर्ग, राष्ट्रभाषा वर्ग होते. तसेच संस्कृत भाषा वर्ग, गुजराथी भाषा वर्ग, बंगाली भाषा वर्ग, मिलिटरी कमिशन वर्ग, पब्लिक सर्व्हिस वर्गदेखील मंडलातर्फे चालविले जात. लोकहितवादी मंडळ विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत काम करीत होते, हे लक्षात येते.
१९५८ च्या फेब्रुवारी महिन्यात लोकहितवादी मंडळातर्फे हॅम्लेट आणि वेड्याचे घर उन्हात या दोन नाटकांचे प्रयोग नाशिकमध्ये झाले. हॅम्लेटची भूमिका दामू केंकरे यांनी तर दादाची भूमिका श्रीराम लागू यांनी केली होती. १९६५ मध्ये आयनटीतर्फे झोपी गेलेला जागा झाला या नाटकाचा प्रयोग नाशिकला होता. त्यादिवशी नाशिकला जोराचे वादळ झाले. वादळ बराच वेळ चालू होते पण प्रयोगाला सुरुवात झाली.
लोकहितवादी मंडळाची व्याख्याने सुरुवातीला तिकीट लावून होत असत. रुंग्ठा हायस्कूलच्या मैदानात व्याख्याने होत असे. नाटकांपेक्षा या व्याख्यानांनाच गर्दी खूप असे. द. शं. पोतनीस, डॉ. अ. वा. वर्टी, म. रा. दळवी, वा. श्री. पुरोहित, माधवराव लिमये, कवी कुसुमाग्रज, दत्ता सराफ, विश्वनाथ गुप्ते, भगवान अंधृटकर, मु. शं. औरंगाबादकर, ब. चिं. सहस्त्रबुध्दे, गो. के. खरे, प्र. वा. टकले, ग. वि. अकोलकर, डॉ. बा. वा. दातार, डॉ. वि. भि. फडके, ह. के. कडवे, शरदचंद्र बुरकुले, ल. आ. जाधव, ग. दा. काळे, उषा दळवी, उषा लिमये, बाळ भाटे, कुमुद अभ्यंकर, यास्मिन शेख, रा. ग. वीरकर, प्रभाकर घारपुरे, दत्ता नाडगौडा, सुधा फडके, कुसुम गुप्ते, दुर्गा दीक्षित, इंदुताई देशपांडे, रत्नमाला हडप यांचे सतत सहकार्य लाभले.
कालांतराने सांस्कृतिक व सामाजिक, शैक्षणिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्या सर्व संस्था मनापासून काम करीत आहेत. त्यामुळे लोकहितवादी मंडळाच्या कार्याला मर्यादा पडली. पण आजही नाट्यस्पर्धेत लोकहितवादी मंडळाचे नाव चमकते.
(लेखिका साहित्य व संस्कृती विषयाच्या अभ्यासिका आहेत)
नाशिकमधील सांस्कृतिक व वाङमयीन क्षेत्रातील एक महत्त्वाची संस्था म्हणजे लोकहितवादी मंडळ. कालांतराने सांस्कृतिक व सामाजिक, शैक्षणिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था स्थापन झाल्या. पण, आजही नाट्यस्पर्धेत लोकहितवादी मंडळाचे नाव चमकते.
क्षनिष्ठ राजकारणापासून अलिप्त राहून ज्ञान कला व साहित्य यांचा प्रसार, पुरस्कार व विचार करण्यासाठी या संस्थेची २ सप्टेंबर १९५० रोजी स्थापना करण्यात आली. संस्थेच्या उद्घाटनाचा औपचारिक समारंभ ४ ऑक्टोबर १९५० रोजी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली झाला. उद्घाटन समारंभाच्यावेळी महामहोपाध्याय पोतदारांचे ब्रिटिश राजवटींची देणीघेणी या विषयावर व्याख्यान झाले होते. सदुसष्ट वर्षांपूर्वी आकाशवाणी, वृत्तपत्रे, व्याख्याने हीच ज्ञानप्रसाराची व करमणुकीची साधने असल्यामुळे लोकजीवनात सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी व साहित्यविषयी अभिरूची निर्माण करण्यासाठी लोकहितवादी मंडळाने पुढाकार घेतला होता. तसेच साहित्यातील नवप्रवाहांचा परिचय करून देण्याचाही लोकहितवादी मंडळाचा उद्देश होता. स्थापनेनंतरच्या पहिल्याच वर्षात शारदीय महोत्सवात प्रा. ना.सी.फडके यांचे ललित कथेचे सामर्थ्य आणि प्रा. वि. ह. कुलकर्णी यांचे विनोद या विषयावरील व्याख्यान आयोजित केले. मोघुबाई कुर्डीकर यांचा गायनाचा कार्यक्रम आणि प्रसिध्द अभिनेत्री स्नेहलता प्रधान यांचे फिल्म्स ऑफ टुडे, मालतीबाई बेडेकर यांचे स्त्री कालची आजची उद्याची या विषयावरील व्याख्याने आयोजित करण्यात आली. यावरून महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा लोकहितवादी मंडळाचा उद्देश होता हे स्पष्टपणे दिसते.
१९५२ साली संस्थेने वासंतिक नाट्य महोत्सव आयोजित केला होता त्याचे नियोजन ब. चिं सहस्त्रबुध्दे यांनी केले होते. या नाट्यमहोत्सवात साष्टांग नमस्कार, पारध, अंमलदार, निशिकांताची नवरी, भावबंधन ही नाटके नाशिककरांना पहायला मिळाली. शारदीय महोत्सवात नामांकित लेखक व समीक्षक यांची व्याख्यानमाला हे लोकहितवादी मंडळाचे महत्त्वाचे कार्य होते. वृत्तपत्रे व आकाशवाणी ही दोनच प्रसारमाध्यमे त्या काळी असल्याने अशा व्याख्यानांचा लाभ घेण्यासाठी नाशिककर गर्दी करीत असतं. उच्च अभिरूची निर्माण करणे या उद्देशाप्रमाणेच नवविचारांचा प्रसार करणे आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणणे या दृष्टीनेही मंडळाचे कार्य सुरू होते. शकुंतला परांजपे यांचे संततीनियमन या विषयावरील व्याख्यान ठेवण्यामागे मंडळाची ही भूमिका स्पष्टपणे दिसते.
लोकहितवादी मंडळाच्या वतीने विविध व्याख्यानांबरोबरच परिसंवाद, चर्चा, अभिरूप न्यायालय, नाट्यवाचन, काव्यवाचन, व्यवसाय मार्गदर्शन, अभिनयासह सप्रयोग व्याख्याने अशा अभिनव कार्यक्रमांचा नाशिककरांना लाभ मिळे.
साधना हा एक विशेष उपक्रम लोकहितवादी मंडळाने सुरू केला होता. मंडळाचे कार्यकर्ते व अभ्यासू नागरिक एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करीत असत. तसेच नाट्यवाचन, संगीत सभा, प्रश्नमाला असे अभिनव कार्यक्रमही राबविले जात. प्रौढ नागरिक व विद्यार्थी वर्गासाठी मसाप वर्ग, राष्ट्रभाषा वर्ग होते. तसेच संस्कृत भाषा वर्ग, गुजराथी भाषा वर्ग, बंगाली भाषा वर्ग, मिलिटरी कमिशन वर्ग, पब्लिक सर्व्हिस वर्गदेखील मंडलातर्फे चालविले जात. लोकहितवादी मंडळ विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवत काम करीत होते, हे लक्षात येते.
१९५८ च्या फेब्रुवारी महिन्यात लोकहितवादी मंडळातर्फे हॅम्लेट आणि वेड्याचे घर उन्हात या दोन नाटकांचे प्रयोग नाशिकमध्ये झाले. हॅम्लेटची भूमिका दामू केंकरे यांनी तर दादाची भूमिका श्रीराम लागू यांनी केली होती. १९६५ मध्ये आयनटीतर्फे झोपी गेलेला जागा झाला या नाटकाचा प्रयोग नाशिकला होता. त्यादिवशी नाशिकला जोराचे वादळ झाले. वादळ बराच वेळ चालू होते पण प्रयोगाला सुरुवात झाली.
लोकहितवादी मंडळाची व्याख्याने सुरुवातीला तिकीट लावून होत असत. रुंग्ठा हायस्कूलच्या मैदानात व्याख्याने होत असे. नाटकांपेक्षा या व्याख्यानांनाच गर्दी खूप असे. द. शं. पोतनीस, डॉ. अ. वा. वर्टी, म. रा. दळवी, वा. श्री. पुरोहित, माधवराव लिमये, कवी कुसुमाग्रज, दत्ता सराफ, विश्वनाथ गुप्ते, भगवान अंधृटकर, मु. शं. औरंगाबादकर, ब. चिं. सहस्त्रबुध्दे, गो. के. खरे, प्र. वा. टकले, ग. वि. अकोलकर, डॉ. बा. वा. दातार, डॉ. वि. भि. फडके, ह. के. कडवे, शरदचंद्र बुरकुले, ल. आ. जाधव, ग. दा. काळे, उषा दळवी, उषा लिमये, बाळ भाटे, कुमुद अभ्यंकर, यास्मिन शेख, रा. ग. वीरकर, प्रभाकर घारपुरे, दत्ता नाडगौडा, सुधा फडके, कुसुम गुप्ते, दुर्गा दीक्षित, इंदुताई देशपांडे, रत्नमाला हडप यांचे सतत सहकार्य लाभले.
कालांतराने सांस्कृतिक व सामाजिक, शैक्षणिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था स्थापन झाल्या. त्या सर्व संस्था मनापासून काम करीत आहेत. त्यामुळे लोकहितवादी मंडळाच्या कार्याला मर्यादा पडली. पण आजही नाट्यस्पर्धेत लोकहितवादी मंडळाचे नाव चमकते.
(लेखिका साहित्य व संस्कृती विषयाच्या अभ्यासिका आहेत)