काही वर्षांपूर्वी राम पटवर्धन यांनी मार्जोरी किनन रॉलिंग्ज या लेखिकेच्या ‘द इयरलिगचा’ केलेला ‘पाडस’ नावाचा अनुवाद वाचण्यात आला आणि सकस, आशयपूर्ण अनुवाद मनात घर करून बसला. अमेरिकेतल्या प्लोरिडा राज्यातल्या जंगलात घडणारे हे कथानक तब्बल १३५ वर्षांपूर्वीचं तरीही आज तितकच टवटवीत. पेनी बॅक्स्टर या छोट्या मुलांचं मोठ होणं आणि त्याला वास्तवाचं भान येणं हा प्रवास यात मांडलाय. परिपूर्ण वाचनाचा भाषा-संस्कृतीची एकसंघता याची प्रचीती यातून आली. भाषेत होणाऱ्या सर्जनशील निर्मितीमुळे ती भाषा जिवंत असल्याची स्पंदने सुरू असल्याची जाणीव आपल्याला होते आणि अनुवादामुळे ती भाषा समृद्ध होते, असे म्हटले जाते. अनुवादाच्या प्रक्रियेत मूळ भाषिक कलाकृती दुसऱ्या भाषेत जातांना त्यातील जीवन जाणिवांचा प्रामुख्याने विचार महत्त्वाचा ठरतो. भाषांतर होतांना काळ आणि अवकाश यांचा तोल सांभाळणे ही भाषांतरकाराची खरी कसोटी असते. अनुवादाची क्रिया ही भाषिक कलाकृती समजून घेणे तिचा अन्वय मनात तयार होणे अशी असते. क्रिएटीव्ह रायटींग करतांना लेखक अंतर्मुख होऊन मनातील अव्यक्त भावनांना व्यक्त करण्यासाठीचा संघर्ष करत असतो आणि त्यातून निघणारा अभिव्यक्तिचा, कोंभ म्हणजे त्याचा लेखनाचा उद्गार असतो. अनुवादात मात्र, बहिर्मुख होऊन समोरच्या वर्तमानाशी त्याचा सांधा जोडावा लागतो आणि आशयाशी बांधिलकी ठेवावी लागते.
अनुवादातून भाषिक-सामाजिक सांस्कृतिक संदर्भाचा, वैशिष्ठांचा कोलाज समोर येत असतो. विद्याकर पुंडलिकांनी चार्ल्स डिकन्सच्या ‘अ टेल ऑफ टू सिटीज’ चा केलेला मराठी अनुवाद फ्रेंच राज्यक्रांतीची पार्श्वभूमी असूनही त्यातील राजकीय संदर्भ सत्ताधाऱ्यांच्या वैश्विक मानसिकतेचे चित्रण उभे करतो.
सुनील गंगोपाध्याय यांच्या ‘प्रथम आलो’ या कादंबरीचा रंजना पाठक यांनी केलेला अनुवादही ब्रिटीशकालीन बंगाल-त्रिपुरातील वास्तवाचा विलक्षण शोध घेणारा आहे. या प्रकाराच्या अनुवादांतून सामाजिक-राजकीय स्थित्यंतराची ओळख आपल्याला होते. नाशिकमधून वैशिष्ट्यपूर्ण अनुवाद प्रकाशित झाले असून साहित्य क्षेत्रात सदर पुस्तकांची नोंद घेतली आहे, हे आर्वजून नमूद करावेसे वाटते.
दंगलीसारखा संवेदनशील विषय मीना मेनन यांनी ‘रायटस् अॅण्ड आफ्टर इन मुंबई’ या पुस्तकातून मांडला आहे. वर्तमानकालीन, समकालीन प्रश्नांचा वेध घेणार हे लेखन सर्व सामान्यांच्या व्यथा मांडणार आहे. हे भयवास्तव पत्रकार दीप्ती राऊत यांना जाणवलं. जाती, धर्माचे भेद हे प्रखर होत आहेत आणि त्याचे बरेवाईट पडसाद आपल्या ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहोचले आहेत. जातीभेदामुळे दरी निर्माण झाली आहे. दंगलीची नेमकी कारणे काय? या प्रश्नांचा वेध घेतांनाच त्यांना मीना मेनन यांचं पुस्तक हाती लागतं आणि ‘धगधगती मुंबई’ या नावाने त्या अनुवाद करतात. दंगलीनंतर आतून तुटलेल्या माणसांची कहाणी यात आहे आणि तेच जळजळीत वास्तव त्यांनी मराठीत आणलं आहे. भाषांतराची परिणामकारकता काय असते याचा हा अनुभव आहे.
विज्ञान, साहित्य, कला, आरोग्य आणि जीवनशैली, व्यक्तीवेध यांचा वेध घेणारं विविधांगी लेखन आज भाषांतराच्या माध्यमातून समोर येते आहे. एक नवं वैश्विक भान वाचकाला यामुळे निश्चित येते.
कादंबरी न लिहीता तिची व्याप्ती आणि खोली लघुकथेला प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे जी. ए. कुलकर्णी, जी. ए. च्या निवडक कथांचे अनुवाद ‘अ जर्नी फॉरएव्हर-इस्किलार अॅड अदर स्टोरीज’ या नावाने डॉ. विलास साळुंके यांनी इंग्रजीत केले आहेत. जीवनात खोलवर रूजलेली विसंगती, अभिव्यक्त करण्यासाठी एक जादूई काव्यमय वास्तवाचे दर्शन घडवणारी साक्षात्कारी मराठी कथा आपल्या भारतीय शैलीत जी. ए. नी निर्माण केली आणि ह्या एका मौलिक कथालेखकाचे वाङमयीन वेगळेपण डॉ. साळुंके यांनी जागतिक स्तरावर नेले आहे.
या बरोबरच डॉ. साळुंके यांनी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक सदानंद देशमुख यांची ‘बारोमास’ ही कादंबरी इंग्रजीत अनुवादीत केली आहे. यात वापरलेली भाषा वैदर्भीय, वऱ्हाडी बोली आहे. शेतकरी कुटुंबात घडणारे यातील नाट्य इंग्रजीत नेणे आव्हानच होते यांनी अत्यंत प्रभावीपणे पेलले आहे. तसेच डॉ. साळुंकेनी केलेला ‘स्टीव्ह जॉब्झच्या वॉल्टर आयझॅक्सन’ ने लिहिलेल्या चरित्राचा अनुवाद वाचनीय आहे. या बरोबरच अपर्णा वेलणकर यांनी केलेला अरूंधती रॉय यांच्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ चा अनुवाद नंदन निलेकणीचा ‘इमॅजिनींग इंडीया’ व ग्रेगरी रॉबर्टसच्या बहुचर्चित ‘शांताराम’ चा अनुवाद भाषेची श्रीमंती वाढवणारे ठरले आहेत.
अभय सदावर्तेनी डॉ. ए. पी. जे कलाम व वाय. एस. राजन यांच्या ‘इंडीया २०२०’ गोपाल राज यांच्या ‘बखर इस्त्रोच्या अग्निबाणाची, देवदत्त पटनायक यांच्या जय महाभारताचा सचित्र अनुवाद, प्रगतीशील भारताच्या ध्येयपूर्ण वाटचालीचा लेखा-जोखा मांडणारे आणि प्रत्येकात आत्मविश्वास निर्माण करणारे आहेत.
विकास स्वरूपच्या पुस्तकांचे ‘स्लमडॉग मिलेनिअर’, ‘सहा संशयित’ हे वंदना अत्रेंनी केलेले अनुवाद तसेच डॉ. चंद्रकांत संकलेचा व वंदना अत्रेंनी केलेले ‘अँटिकॅन्सर अ न्यू वे ऑफ लाईफ’ चे भाषांतर आरोग्यविषयक जाणीव जागृती निर्माण करणारे आहे.
वृंदा भार्गवेंनी मूकवेदना (काळोखातील भारताची) या पुस्तकातून एकविसाव्या शतकातील भारताच्या अस्तित्त्वाची आणि दुखरी बाजू सांगणाऱ्या वास्तवाची जळजळीत कहाणी अनुवादातून समोर आणली आहे. माणसांचे रोजचे जगणं आणि जगण्याची घोर उपेक्षा यात आहे. ‘पीपल अनलाईक अस ‘द इंडिया दॅट इज इनव्हीजीबल’च हे आशयपूर्ण भाषांतर आहे. निर्मितीक्षमतेच्या नव्या घुसळणीची अनुवाद ही पायवाट असते आणि त्यातून परस्पर संवादाची वीण घट्ट होत असते.
(लेखक नामवंत कवी व समीक्षक आहेत)
अनुवादातून भाषिक-सामाजिक सांस्कृतिक संदर्भाचा, वैशिष्ठांचा कोलाज समोर येत असतो. विद्याकर पुंडलिकांनी चार्ल्स डिकन्सच्या ‘अ टेल ऑफ टू सिटीज’ चा केलेला मराठी अनुवाद फ्रेंच राज्यक्रांतीची पार्श्वभूमी असूनही त्यातील राजकीय संदर्भ सत्ताधाऱ्यांच्या वैश्विक मानसिकतेचे चित्रण उभे करतो.
सुनील गंगोपाध्याय यांच्या ‘प्रथम आलो’ या कादंबरीचा रंजना पाठक यांनी केलेला अनुवादही ब्रिटीशकालीन बंगाल-त्रिपुरातील वास्तवाचा विलक्षण शोध घेणारा आहे. या प्रकाराच्या अनुवादांतून सामाजिक-राजकीय स्थित्यंतराची ओळख आपल्याला होते. नाशिकमधून वैशिष्ट्यपूर्ण अनुवाद प्रकाशित झाले असून साहित्य क्षेत्रात सदर पुस्तकांची नोंद घेतली आहे, हे आर्वजून नमूद करावेसे वाटते.
दंगलीसारखा संवेदनशील विषय मीना मेनन यांनी ‘रायटस् अॅण्ड आफ्टर इन मुंबई’ या पुस्तकातून मांडला आहे. वर्तमानकालीन, समकालीन प्रश्नांचा वेध घेणार हे लेखन सर्व सामान्यांच्या व्यथा मांडणार आहे. हे भयवास्तव पत्रकार दीप्ती राऊत यांना जाणवलं. जाती, धर्माचे भेद हे प्रखर होत आहेत आणि त्याचे बरेवाईट पडसाद आपल्या ग्रामीण भागापर्यंत येऊन पोहोचले आहेत. जातीभेदामुळे दरी निर्माण झाली आहे. दंगलीची नेमकी कारणे काय? या प्रश्नांचा वेध घेतांनाच त्यांना मीना मेनन यांचं पुस्तक हाती लागतं आणि ‘धगधगती मुंबई’ या नावाने त्या अनुवाद करतात. दंगलीनंतर आतून तुटलेल्या माणसांची कहाणी यात आहे आणि तेच जळजळीत वास्तव त्यांनी मराठीत आणलं आहे. भाषांतराची परिणामकारकता काय असते याचा हा अनुभव आहे.
विज्ञान, साहित्य, कला, आरोग्य आणि जीवनशैली, व्यक्तीवेध यांचा वेध घेणारं विविधांगी लेखन आज भाषांतराच्या माध्यमातून समोर येते आहे. एक नवं वैश्विक भान वाचकाला यामुळे निश्चित येते.
कादंबरी न लिहीता तिची व्याप्ती आणि खोली लघुकथेला प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे जी. ए. कुलकर्णी, जी. ए. च्या निवडक कथांचे अनुवाद ‘अ जर्नी फॉरएव्हर-इस्किलार अॅड अदर स्टोरीज’ या नावाने डॉ. विलास साळुंके यांनी इंग्रजीत केले आहेत. जीवनात खोलवर रूजलेली विसंगती, अभिव्यक्त करण्यासाठी एक जादूई काव्यमय वास्तवाचे दर्शन घडवणारी साक्षात्कारी मराठी कथा आपल्या भारतीय शैलीत जी. ए. नी निर्माण केली आणि ह्या एका मौलिक कथालेखकाचे वाङमयीन वेगळेपण डॉ. साळुंके यांनी जागतिक स्तरावर नेले आहे.
या बरोबरच डॉ. साळुंके यांनी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक सदानंद देशमुख यांची ‘बारोमास’ ही कादंबरी इंग्रजीत अनुवादीत केली आहे. यात वापरलेली भाषा वैदर्भीय, वऱ्हाडी बोली आहे. शेतकरी कुटुंबात घडणारे यातील नाट्य इंग्रजीत नेणे आव्हानच होते यांनी अत्यंत प्रभावीपणे पेलले आहे. तसेच डॉ. साळुंकेनी केलेला ‘स्टीव्ह जॉब्झच्या वॉल्टर आयझॅक्सन’ ने लिहिलेल्या चरित्राचा अनुवाद वाचनीय आहे. या बरोबरच अपर्णा वेलणकर यांनी केलेला अरूंधती रॉय यांच्या ‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ चा अनुवाद नंदन निलेकणीचा ‘इमॅजिनींग इंडीया’ व ग्रेगरी रॉबर्टसच्या बहुचर्चित ‘शांताराम’ चा अनुवाद भाषेची श्रीमंती वाढवणारे ठरले आहेत.
अभय सदावर्तेनी डॉ. ए. पी. जे कलाम व वाय. एस. राजन यांच्या ‘इंडीया २०२०’ गोपाल राज यांच्या ‘बखर इस्त्रोच्या अग्निबाणाची, देवदत्त पटनायक यांच्या जय महाभारताचा सचित्र अनुवाद, प्रगतीशील भारताच्या ध्येयपूर्ण वाटचालीचा लेखा-जोखा मांडणारे आणि प्रत्येकात आत्मविश्वास निर्माण करणारे आहेत.
विकास स्वरूपच्या पुस्तकांचे ‘स्लमडॉग मिलेनिअर’, ‘सहा संशयित’ हे वंदना अत्रेंनी केलेले अनुवाद तसेच डॉ. चंद्रकांत संकलेचा व वंदना अत्रेंनी केलेले ‘अँटिकॅन्सर अ न्यू वे ऑफ लाईफ’ चे भाषांतर आरोग्यविषयक जाणीव जागृती निर्माण करणारे आहे.
वृंदा भार्गवेंनी मूकवेदना (काळोखातील भारताची) या पुस्तकातून एकविसाव्या शतकातील भारताच्या अस्तित्त्वाची आणि दुखरी बाजू सांगणाऱ्या वास्तवाची जळजळीत कहाणी अनुवादातून समोर आणली आहे. माणसांचे रोजचे जगणं आणि जगण्याची घोर उपेक्षा यात आहे. ‘पीपल अनलाईक अस ‘द इंडिया दॅट इज इनव्हीजीबल’च हे आशयपूर्ण भाषांतर आहे. निर्मितीक्षमतेच्या नव्या घुसळणीची अनुवाद ही पायवाट असते आणि त्यातून परस्पर संवादाची वीण घट्ट होत असते.
(लेखक नामवंत कवी व समीक्षक आहेत)