अशोक बेलसरे
राज्य सरकार महाराष्ट्रातील रात्रशाळा टप्प्याटप्प्याने बंद करणार आहे. रात्रशाळेमध्ये येणारे विद्यार्थी हे कष्टकरी, निम्नमध्यमवर्गीय कुटुंबांतील असतात. दिवसा रोजगार कमावून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावून स्वतःचे शिक्षण सायंकाळनंतर पुढील तीन तासांत घेतात. अशा विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या हक्कावर आता गदा येणार का?
गरीब, गरजू, कष्टकरी विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने १८५५ साली म. जोतिराव फुले यांनी पुणे येथे रात्रशाळा सुरू केली. नंतर १८६६मध्ये भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी मुंबई येथे रात्रशाळा सुरू केली. तेव्हापासून रात्रशाळा या अव्याहतपणे गेली १६० वर्षे चालू आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्या १० वर्षांत पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर या शहरांत वेगाने रात्रशाळा सुरू करण्यात आल्या. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन रात्र कनिष्ठ महाविद्यालये व रात्र महाविद्यालये अनुदान तत्त्वावर सुरू करण्यात आली. या रात्रशाळांमध्ये आज जवळजवळ ३५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. दिवसाच्या शाळेप्रमाणे पूर्ण अभ्यासक्रम रात्रीच्या शाळेत तीन तासांत पूर्ण करणारी शासनमान्य रात्रशाळा व्यवस्था फक्त महाराष्ट्रातच उपलब्ध आहे, ही खरे तर अभिमानाची गोष्ट आहे.
रात्रशाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत भरारी घेत आहेत. रात्रशाळा ही काळाची गरज ओळखून तेथे शिकवणारा शिक्षक हा अध्यापनकौशल्य जाणणारा व अर्ध्या वेळात गोळीबंद शिक्षण देण्याची हातोटी असलेला असायला हवा. शिक्षणाची पालखी शिक्षकांच्या खांद्यावर असते. पालक, संस्थाचालक, प्रशासन व शिक्षक हे शिक्षणाच्या जबाबदारीचे चार खांब आहेत. त्यातील एक जरी कमकुवत झाला, तर शिक्षणव्यवस्था मोडून पडते. म्हणून प्रशासनाने सुद्धा रात्रशाळेतील विद्यार्थी संख्या विचारात न घेता अगदी १० विद्यार्थी असले, तरी त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक दिला पाहिजे. शिक्षकांचा कोरम रात्रशाळेमध्ये पुरेसा नसेल, तर दर्जेदार शिक्षण गरीब विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
शिक्षण हक्क कायदा २००९, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक सर्व शिक्षा अभियान यासारख्या शिक्षण क्षेत्रातील मूल्यगामी निर्णयांमध्ये रात्रशाळांचे प्रतिबिंब अजिबात दिसत नाही, कारण कदाचित रात्रशाळा ही व्यवस्था फक्त महाराष्ट्रातच प्रभावी आहे. तरी सुद्धा रात्रशाळेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अर्धवेळ शाळा या सबबी खाली रात्रशाळांना अनेक योजनांपासून वंचित ठेवले जाते. उदाः पोषण आहाराची गरज रात्रशाळेला अधिक आहे. कारण विद्यार्थी दिवसभर काम करून दमून उपाशीपोटी येतात. त्यांना पोषक आहाराची गरज असते. रात्रशाळेत शिकणारे विद्यार्थी गरीब व वंचित असल्याने त्यांना मोफत पाठ्युपस्तके व वह्या देणे आवश्यक आहे. शासनाने आजवर हे केले नाही म्हणून रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक भारतीने ‘मासूम’ या संस्थेची मदत घेतली. अशा काही स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या आधार व पाठिंब्यावर राज्यातील रात्रशाळा आजवर सुरू आहेत. ‘मासूम’मार्फत मुंबईत ५१ रात्रशाळांतील विद्यार्थ्यांसाठी निरनिराळे शैक्षणिक प्रकल्प राबवले जात आहेत. त्याचा परिणाम अतिशय उत्साहजनक आहे.
पूर्वी रात्रशाळांचे निकाल खूपच कमी लागत. आता चित्र बदलले आहे. निकाल खूपच उंचावले आहेत. या वर्षी तर १५ रात्रशाळांचे निकाल १०० टक्के लागले, तर ६० टक्क्यांवर निकाल लागलेल्या अनेक रात्रशाळा आहेत. याचा अर्थ रात्रशाळा ही काळाची गरज आहे. दिवसाच्या शाळांमध्ये ड्रॉपआऊट होणारी मुले रात्रशाळांमुळे पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आली. अनेक गुन्हेगारी मार्गावर जाण्यापासून वाचली. हजारो मुलांची आयुष्ये त्यामुळे उजळली. रात्रशाळांमधून शिकून काही मुले उद्योजक झाली. मुंबई पोलिसांमध्ये तर शेकडो जण रात्रशाळेतले विद्यार्थी आहेत. सुशिलकुमार शिंदे, नारायण राणे, विद्यमान मंत्री दिलीप कांबळे रात्रशाळेतूनच मोठे झाले.
परंतु आता राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार म्हणतात, की आम्ही रात्रशाळा टप्प्याटप्प्याने बंद करणार. त्यांनी मुक्त शाळेचा (Open School) पर्याय सुचवला आहे. ओपन स्कूल म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची मुक्त शाळा...शांति निकेतन नव्हे. बिनशिक्षकांची, बिनभिंतीची बहिस्थ परीक्षा घेणारी मुक्तशाळा! मुक्त विद्यापीठ, बहिस्थ परीक्षा यामुळे शाळाबाह्य युवकांना पुन्हा शिक्षण प्रवाहात येता येते हे खरे, पण हा पर्याय शाळेनंतरच्या पुढील शिक्षणाचा असतो. व्यक्तीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शालेय शिक्षण आवश्यक असते.
ओपन स्कूलमध्ये दैनंदिन अध्यापन, वैयक्तिक मार्गदर्शन होत नाही. ज्या विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण नसते, जागेची कमतरता असते, घरात शिक्षणाची परंपरा नसते, पण शिकण्याची जिद्द असते त्यांच्यासाठी रात्रशाळा आहे. त्यांना शिक्षणाची दारे बंद कशी करता येतील?
हे लक्षात घेता, सरकारने रात्रशाळा बंद न करता त्यांना प्रोत्साहनपर वेतनेतर अनुदान ताबडतोब सुरू करावे. दुसरे महत्वाचे, नवीन संचमान्यतेमुळे विद्यार्थ्यांना विषयवार शिक्षक मिळत नाहीत, तेव्हा रात्रशाळेसाठी जुनीच संचमान्यता मंजूर करावी. रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार द्यावा. दहा जरी विद्यार्थी असतील, तरी तुकडी बंद करू नये. रात्रशाळेतील ९ वी ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके द्यावीत. दिवस अर्थार्जन करू, रात्री ज्ञानार्जन करू आणि आयुष्याची लढाई सन्मानाने यशस्वी करू या विद्यार्थ्यांच्या जिद्दीला महाराष्ट्र सरकारने खरे तर दाद द्यायला हवी. शिक्षणक्षेत्रात नवनवे प्रयोग जरूर व्हावेत, परंतु ते करताना रात्रशाळांचा मिणमिणता दिवा प्रज्ज्वलित राहण्यातच महाराष्ट्राच्या शिक्षणपरंपरेचा गौरव आहे.
(लेखक शिक्षक भारती या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत.)
राज्य सरकार महाराष्ट्रातील रात्रशाळा टप्प्याटप्प्याने बंद करणार आहे. रात्रशाळेमध्ये येणारे विद्यार्थी हे कष्टकरी, निम्नमध्यमवर्गीय कुटुंबांतील असतात. दिवसा रोजगार कमावून आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावून स्वतःचे शिक्षण सायंकाळनंतर पुढील तीन तासांत घेतात. अशा विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या हक्कावर आता गदा येणार का?
गरीब, गरजू, कष्टकरी विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण मिळावे या उद्देशाने १८५५ साली म. जोतिराव फुले यांनी पुणे येथे रात्रशाळा सुरू केली. नंतर १८६६मध्ये भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी मुंबई येथे रात्रशाळा सुरू केली. तेव्हापासून रात्रशाळा या अव्याहतपणे गेली १६० वर्षे चालू आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्या १० वर्षांत पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अहमदनगर या शहरांत वेगाने रात्रशाळा सुरू करण्यात आल्या. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन रात्र कनिष्ठ महाविद्यालये व रात्र महाविद्यालये अनुदान तत्त्वावर सुरू करण्यात आली. या रात्रशाळांमध्ये आज जवळजवळ ३५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. दिवसाच्या शाळेप्रमाणे पूर्ण अभ्यासक्रम रात्रीच्या शाळेत तीन तासांत पूर्ण करणारी शासनमान्य रात्रशाळा व्यवस्था फक्त महाराष्ट्रातच उपलब्ध आहे, ही खरे तर अभिमानाची गोष्ट आहे.
रात्रशाळेत शिकलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत भरारी घेत आहेत. रात्रशाळा ही काळाची गरज ओळखून तेथे शिकवणारा शिक्षक हा अध्यापनकौशल्य जाणणारा व अर्ध्या वेळात गोळीबंद शिक्षण देण्याची हातोटी असलेला असायला हवा. शिक्षणाची पालखी शिक्षकांच्या खांद्यावर असते. पालक, संस्थाचालक, प्रशासन व शिक्षक हे शिक्षणाच्या जबाबदारीचे चार खांब आहेत. त्यातील एक जरी कमकुवत झाला, तर शिक्षणव्यवस्था मोडून पडते. म्हणून प्रशासनाने सुद्धा रात्रशाळेतील विद्यार्थी संख्या विचारात न घेता अगदी १० विद्यार्थी असले, तरी त्यांना शिकवण्यासाठी शिक्षक दिला पाहिजे. शिक्षकांचा कोरम रात्रशाळेमध्ये पुरेसा नसेल, तर दर्जेदार शिक्षण गरीब विद्यार्थ्यांना मिळणार नाही.
शिक्षण हक्क कायदा २००९, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक सर्व शिक्षा अभियान यासारख्या शिक्षण क्षेत्रातील मूल्यगामी निर्णयांमध्ये रात्रशाळांचे प्रतिबिंब अजिबात दिसत नाही, कारण कदाचित रात्रशाळा ही व्यवस्था फक्त महाराष्ट्रातच प्रभावी आहे. तरी सुद्धा रात्रशाळेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अर्धवेळ शाळा या सबबी खाली रात्रशाळांना अनेक योजनांपासून वंचित ठेवले जाते. उदाः पोषण आहाराची गरज रात्रशाळेला अधिक आहे. कारण विद्यार्थी दिवसभर काम करून दमून उपाशीपोटी येतात. त्यांना पोषक आहाराची गरज असते. रात्रशाळेत शिकणारे विद्यार्थी गरीब व वंचित असल्याने त्यांना मोफत पाठ्युपस्तके व वह्या देणे आवश्यक आहे. शासनाने आजवर हे केले नाही म्हणून रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक भारतीने ‘मासूम’ या संस्थेची मदत घेतली. अशा काही स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या आधार व पाठिंब्यावर राज्यातील रात्रशाळा आजवर सुरू आहेत. ‘मासूम’मार्फत मुंबईत ५१ रात्रशाळांतील विद्यार्थ्यांसाठी निरनिराळे शैक्षणिक प्रकल्प राबवले जात आहेत. त्याचा परिणाम अतिशय उत्साहजनक आहे.
पूर्वी रात्रशाळांचे निकाल खूपच कमी लागत. आता चित्र बदलले आहे. निकाल खूपच उंचावले आहेत. या वर्षी तर १५ रात्रशाळांचे निकाल १०० टक्के लागले, तर ६० टक्क्यांवर निकाल लागलेल्या अनेक रात्रशाळा आहेत. याचा अर्थ रात्रशाळा ही काळाची गरज आहे. दिवसाच्या शाळांमध्ये ड्रॉपआऊट होणारी मुले रात्रशाळांमुळे पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आली. अनेक गुन्हेगारी मार्गावर जाण्यापासून वाचली. हजारो मुलांची आयुष्ये त्यामुळे उजळली. रात्रशाळांमधून शिकून काही मुले उद्योजक झाली. मुंबई पोलिसांमध्ये तर शेकडो जण रात्रशाळेतले विद्यार्थी आहेत. सुशिलकुमार शिंदे, नारायण राणे, विद्यमान मंत्री दिलीप कांबळे रात्रशाळेतूनच मोठे झाले.
परंतु आता राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार म्हणतात, की आम्ही रात्रशाळा टप्प्याटप्प्याने बंद करणार. त्यांनी मुक्त शाळेचा (Open School) पर्याय सुचवला आहे. ओपन स्कूल म्हणजे रवींद्रनाथ टागोरांची मुक्त शाळा...शांति निकेतन नव्हे. बिनशिक्षकांची, बिनभिंतीची बहिस्थ परीक्षा घेणारी मुक्तशाळा! मुक्त विद्यापीठ, बहिस्थ परीक्षा यामुळे शाळाबाह्य युवकांना पुन्हा शिक्षण प्रवाहात येता येते हे खरे, पण हा पर्याय शाळेनंतरच्या पुढील शिक्षणाचा असतो. व्यक्तीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शालेय शिक्षण आवश्यक असते.
ओपन स्कूलमध्ये दैनंदिन अध्यापन, वैयक्तिक मार्गदर्शन होत नाही. ज्या विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण नसते, जागेची कमतरता असते, घरात शिक्षणाची परंपरा नसते, पण शिकण्याची जिद्द असते त्यांच्यासाठी रात्रशाळा आहे. त्यांना शिक्षणाची दारे बंद कशी करता येतील?
हे लक्षात घेता, सरकारने रात्रशाळा बंद न करता त्यांना प्रोत्साहनपर वेतनेतर अनुदान ताबडतोब सुरू करावे. दुसरे महत्वाचे, नवीन संचमान्यतेमुळे विद्यार्थ्यांना विषयवार शिक्षक मिळत नाहीत, तेव्हा रात्रशाळेसाठी जुनीच संचमान्यता मंजूर करावी. रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार द्यावा. दहा जरी विद्यार्थी असतील, तरी तुकडी बंद करू नये. रात्रशाळेतील ९ वी ते १२वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके द्यावीत. दिवस अर्थार्जन करू, रात्री ज्ञानार्जन करू आणि आयुष्याची लढाई सन्मानाने यशस्वी करू या विद्यार्थ्यांच्या जिद्दीला महाराष्ट्र सरकारने खरे तर दाद द्यायला हवी. शिक्षणक्षेत्रात नवनवे प्रयोग जरूर व्हावेत, परंतु ते करताना रात्रशाळांचा मिणमिणता दिवा प्रज्ज्वलित राहण्यातच महाराष्ट्राच्या शिक्षणपरंपरेचा गौरव आहे.
(लेखक शिक्षक भारती या संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत.)