राधिका गोडबोले
बडे होकर भाई-बहन कितने दूर जाते है, इतने व्यस्त है सभी, कि मिलने से भी मजबूर हो जाते है... लहानपणी सुटीत अथवा काही कार्याच्या निमित्ताने एकत्र जमून धमाल करणारी चुलत-मावस-आत्ते-मामेभावंडं मोठेपणी नोकरी व्यवसायामुळे व्यस्त होतात आणि एकमेकांपासून दूर जातात. पूर्वी घरातच भावंडे असायची आणि काका, मामा, आत्या किंवा मावशी यांची मुलंही गेस्ट नव्हे, तर घरातलीच वाटायची- वागायची.
अर्थात, आताही बऱ्याच ठिकाणी असे वातावरण घरात असते; पण अनेक ठिकाणी एकुलते एक मूल आणि तेही लाडावलेले असते. कुणाशी काही वाटून घ्यायची (शेअर) सवय, तयारी नसते, शाळा, ट्यूशन, मोबाइल, टीव्ही यात मग्न असल्यामुळे कुणाविषयी वाटून घ्यायला वेळ नसतो. या परिस्थितीत राखी पौर्णिमा, भाऊबीज असे भावंडांना एकत्र आणणारे सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले गेल्यास भावंडांमधील प्रेम नक्कीच वाढेल. काही पाश्चात्त्य देशांमध्ये २४ जुलै हा ‘कझिन्स डे’ म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात कधी झाली माहीत नाही; पण आपल्याकडेही ही प्रथा सुरू करायला हवी. राखी पौर्णिमा साधारण याच सुमारास येते. ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे’ असं म्हंटलं जातं. आपल्याकडे फॅशन अथवा सणवार याबाबत हल्ली उलटा प्रकार दिसतो. आई, आजी अथवा मोठी माणसं काही पारंपरिक, पारिवारिक प्रथा पाळायला सांगतात तेव्हा ‘का’ असा बाणेदार प्रश्न केला जातो. त्यामागे काही वैज्ञानिक, सामाजिक कारणे असो-नसो आपल्या पद्धती मागासलेल्या, अंधश्रद्धा वाटतात; पण हॅलोविन डे आणि असे अनेक डे कौतुकाने साजरे केले जातात (अर्थातच हे सरसकट सर्वांना लागू होत नाही). त्यामानाने ‘कझिन्स डे’ हा आजच्या एकलकोंड्या होत चाललेल्या मुलांसाठी खरंच आवश्यक असा वाटतो. भावंडे नसलेल्या मुलांसाठी कझिन हा जवळचा मित्र/मैत्रीण होऊ शकतो.
लहानपणी चिमण्या दातांनी चिंचा- बोरे, गोळ्या वाटून खाल्लेली सख्खी अथवा चुलत, मावस आते, मामेभावंडे चाळिशी- पन्नाशीत आल्यावरही सुख- दुःख वाटून घेऊ शकतात. अडीअडचणीला धावून येतात. यश, प्रतिष्ठा, पद अशा कशाचीही आडकाठी न येता खऱ्या मित्रासारखी ही भावंडे ‘मैं हू ना’ म्हणतात. हे नाते असे असते, की संपर्कात नसलो तरी अनेक वर्षांनीही कधी अचानक त्यांच्याकडे जाऊन धडकायला काही फॉरमॅलिटी लागत नाही. त्यामुळे या दिवशी आपल्याकडे वेगवेगळी नात्यांची नावे आणि छटा असलेल्या सगळ्या कझिन्सशी तुटलेला संपर्क पुन्हा साधायला हवा अथवा असलेला संपर्क त्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा देऊन वाढवायला हवा.
पुढच्या पिढीला फर्स्ट कझिनच नव्हे- सेकंड, थर्ड अशा म्हणजेच चुलत-चुलत, मावस आत्ते वगैरे नात्यांचीही ओळख असायला हवी. हल्ली आधुनिक संपर्क साधनांमुळे हे शक्य होते आहे. व्हॉट्सअॅपसारख्या मीडियावर फॅमिलीच्या ब्रँचेसचे ग्रुप तयार होत आहेत. अनेक वर्षे नसलेला संपर्क होऊन नात्यांना उजाळा मिळतोय. ‘कझिन्स डे’चा हाच संदेश आहे स्टे कनेक्टेड.
बडे होकर भाई-बहन कितने दूर जाते है, इतने व्यस्त है सभी, कि मिलने से भी मजबूर हो जाते है... लहानपणी सुटीत अथवा काही कार्याच्या निमित्ताने एकत्र जमून धमाल करणारी चुलत-मावस-आत्ते-मामेभावंडं मोठेपणी नोकरी व्यवसायामुळे व्यस्त होतात आणि एकमेकांपासून दूर जातात. पूर्वी घरातच भावंडे असायची आणि काका, मामा, आत्या किंवा मावशी यांची मुलंही गेस्ट नव्हे, तर घरातलीच वाटायची- वागायची.
अर्थात, आताही बऱ्याच ठिकाणी असे वातावरण घरात असते; पण अनेक ठिकाणी एकुलते एक मूल आणि तेही लाडावलेले असते. कुणाशी काही वाटून घ्यायची (शेअर) सवय, तयारी नसते, शाळा, ट्यूशन, मोबाइल, टीव्ही यात मग्न असल्यामुळे कुणाविषयी वाटून घ्यायला वेळ नसतो. या परिस्थितीत राखी पौर्णिमा, भाऊबीज असे भावंडांना एकत्र आणणारे सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले गेल्यास भावंडांमधील प्रेम नक्कीच वाढेल. काही पाश्चात्त्य देशांमध्ये २४ जुलै हा ‘कझिन्स डे’ म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात कधी झाली माहीत नाही; पण आपल्याकडेही ही प्रथा सुरू करायला हवी. राखी पौर्णिमा साधारण याच सुमारास येते. ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे’ असं म्हंटलं जातं. आपल्याकडे फॅशन अथवा सणवार याबाबत हल्ली उलटा प्रकार दिसतो. आई, आजी अथवा मोठी माणसं काही पारंपरिक, पारिवारिक प्रथा पाळायला सांगतात तेव्हा ‘का’ असा बाणेदार प्रश्न केला जातो. त्यामागे काही वैज्ञानिक, सामाजिक कारणे असो-नसो आपल्या पद्धती मागासलेल्या, अंधश्रद्धा वाटतात; पण हॅलोविन डे आणि असे अनेक डे कौतुकाने साजरे केले जातात (अर्थातच हे सरसकट सर्वांना लागू होत नाही). त्यामानाने ‘कझिन्स डे’ हा आजच्या एकलकोंड्या होत चाललेल्या मुलांसाठी खरंच आवश्यक असा वाटतो. भावंडे नसलेल्या मुलांसाठी कझिन हा जवळचा मित्र/मैत्रीण होऊ शकतो.
लहानपणी चिमण्या दातांनी चिंचा- बोरे, गोळ्या वाटून खाल्लेली सख्खी अथवा चुलत, मावस आते, मामेभावंडे चाळिशी- पन्नाशीत आल्यावरही सुख- दुःख वाटून घेऊ शकतात. अडीअडचणीला धावून येतात. यश, प्रतिष्ठा, पद अशा कशाचीही आडकाठी न येता खऱ्या मित्रासारखी ही भावंडे ‘मैं हू ना’ म्हणतात. हे नाते असे असते, की संपर्कात नसलो तरी अनेक वर्षांनीही कधी अचानक त्यांच्याकडे जाऊन धडकायला काही फॉरमॅलिटी लागत नाही. त्यामुळे या दिवशी आपल्याकडे वेगवेगळी नात्यांची नावे आणि छटा असलेल्या सगळ्या कझिन्सशी तुटलेला संपर्क पुन्हा साधायला हवा अथवा असलेला संपर्क त्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा देऊन वाढवायला हवा.
पुढच्या पिढीला फर्स्ट कझिनच नव्हे- सेकंड, थर्ड अशा म्हणजेच चुलत-चुलत, मावस आत्ते वगैरे नात्यांचीही ओळख असायला हवी. हल्ली आधुनिक संपर्क साधनांमुळे हे शक्य होते आहे. व्हॉट्सअॅपसारख्या मीडियावर फॅमिलीच्या ब्रँचेसचे ग्रुप तयार होत आहेत. अनेक वर्षे नसलेला संपर्क होऊन नात्यांना उजाळा मिळतोय. ‘कझिन्स डे’चा हाच संदेश आहे स्टे कनेक्टेड.